Skip to main content

वाङ्मय

एक राजकारणी संत : समर्थ रामदास

लेखक पारा यांनी गुरुवार, 28/10/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्याच काही आठवड्यांपूर्वी सज्जनगडावर गेलो होतो. तिथली एकूण शिस्त आणि व्यवस्था पाहून मी प्रभावित झालो. तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानांतून मी हे पुस्तक निवडलं. 'एक राजकारणी संत : समर्थ रामदास'. हे पुस्तक म्हणजे एक व्याख्यानमाला आहे, रा. शं. वाळिंबे ह्याच्या ओघवत्या शैलीत. एकूण सात दिवस ही व्याख्यानमाला चालली, त्यात त्यांनी रामदासांच्या आयुष्यामधल्या अनेक पैलूंचं व्यवस्थित विवरण करून सांगितलं. हे पुस्तक वाचून मला ही पटलं की समर्थ रामदास खरोखर समर्थ का आहेत ते. आणि ते इतर संतमंडळींपासून कसे पूर्णतया वेगळे ठरतात.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

पुस्तक परीचय: "थ्री कप्स ऑफ टी"

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 22/10/2010 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश. १९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्‍या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन". अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्‍या आणि आपल्या गाडीत झोपणार्‍या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्‍या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे. हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.

मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

लेखक आप्पा यांनी बुधवार, 20/10/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या अच्युत गोडबोलेंच किमयागार वाचतोय. खुपच छान पुस्तक. शक्य असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचायला द्यावे. नक्कीच सायन्सची आवड निर्माण होईल. या लेखात पुस्तकाची माहीती देत नाही पण त्याच्या प्रस्तावनेत जे स्वा. सावरकर व पु ल देशपांडे यांचे विचार मांडले ते देत आहे. प्रस्तावनाच मनाची एवढी पकड घेते की पुढील पुस्तक सोडवत नाही. सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या निबंधातील उतारा आहे. त्यात सावरकर म्हणतात, "आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन. ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे! कारण तो असत्य आहे.

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

घन ओथंबून येती

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/10/2010 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
घन ओथंबून येती वनात राघू घिरघिरती पंखावरती सर ओघळती झाडांतुन झडझडती घन ओथंबुन झरती नदीस सागरभरती डोंगरलाटा वेढित वाटा वेढित मजला नेती घन ओथंबुन आले पिकात केसर ओले आडोशाला जरा बाजूला साजण छेलछबेला घन होऊन बिलगला ना.धों महानोर या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही .खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन! कवी काव्य का लिहतो ?

भैरव गुनि गावत नित..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/10/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
या पूर्वी - सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..) सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन) सकाळची वेळ.. भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..! राग भैरव.. आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग..

चर्पटपंजरिका स्तोत्राचा भावानुवाद

लेखक राघव यांनी गुरुवार, 14/10/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः आदी शंकराचार्यविरचित चर्पटपंजरिका स्तोत्र खाली लिहिलेले आहे. जालावर बर्‍याच ठिकाणी पाठभेद दिसलेत. शेवटी माझ्याजवळील पुस्तकात होते त्याप्रमाणे लिहिलेले आहे. चु.भु.द्या.घ्या. द्वादशपंजरिका व चर्पटपंजरिका अशी दोन स्तोत्रं आहेत. मी केवळ चर्पटपंजरिका स्तोत्राचाच भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. हा भावानुवाद आहे, त्यामुळे मूळ गाभा कायम ठेवून अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.
काव्यरस

मोगरा फुलला

लेखक शुचि यांनी बुधवार, 13/10/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते. "इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्‍हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल.