कॅनव्हास

लेखनविषय:
लेखनप्रकार
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.

सीमापाश

फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)

लेखनप्रकार
मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! :) हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..! :) नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे.. हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं! डौलाने हाक जरा आज नांव रे..! मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी!

मम सुखाची ठेव...

किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच

"लव" इज द "गेम"!

लेखनप्रकार
मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ... आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी... मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. " तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. " मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? " तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. " मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती? तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...! मी : तरी पण सांग ना.....

वयम् मोठम् खोटम्!

माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.

पटकन एक छोटीशी

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कितीतरी दिवसात मिपावर आलो नाही. यायला मिळाले तेही ओझरते. आज कुठूनसा एक अर्धा तास हाती लागला. "किती चातक-चोचीने प्यावा वर्षा ऋतु तरी " अशी अवस्था. म्हण्टले मिळालेला वेळ कारणी लावावा. खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस. कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते.
Subscribe to वाङ्मय