प्रभात राग रंगती...

Taxonomy upgrade extras
भल्या पहाटे 'ललत' षड्ज मध्यमी मूर्च्छना चालली 'भटियारा'ची प्रभातरंगी अर्चना डमडम डमरूची आली 'भैरवा'ची स्वारी तीव्र मध्यम वाढवी 'रामकली'ची खुमारी कारुण्यमय 'तोडी'ची 'आसावरी'शी संगती 'अहिरभैरवा' संगे प्रभात राग रंगती..! -- तात्या अभ्यंकर.

घागबुवा

लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या उत्सवाचे दिवस चालू आहेत कोकणात या उत्सवाला खूप महत्व त्यानिमीत्त मनात आलेला एक विषय. दत्तदासबुवा घाग हे एक अलौकिक, प्रतिभावंत, जाणकार व्यक्तीमत्व, आहे. ते मुळचे नृसिंहवाडीचे. आज बुवांची पासष्टी उलटली तरी बुवा तितक्याच उत्साहाने किर्तनाला उभे राहतात. पण हल्ली बुवांनी किर्तने कमी केली. मी अलीकडच्याच काळात त्यांच किर्तन पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या ओळखितील जाणकारांच्या मते बुवांचा आवाज पुर्वीच्या तुलनेत 30% पण राहीला नाही पण तो आवाजही आज अत्युच्च आनंद देउन जातो. पण आता वयोपरत्वे बुवांना तब्येतही साथ देत नाही. तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

काटेकोरांटीची फुलं.

लेखनविषय:
लेखनप्रकार
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी.

पुस्तक परिचय : कोसळेपर्यंत

लेखनविषय:
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे.

लक्ष्मी-नारायण

लेखनविषय:
स्वर्गामधल्या "बाल-कवी' मार्गावरील "मुक्तांगण' प्रासादातील "फुलराणी' दालनात पु. ल. देशपांडे बसले होते. त्यांच्यासमोर वाजवायची पेटी होती. शेजारी तबलजी बनून वसंतराव देशपांडे बसले होते. पु. ल. तल्लीन होऊन गात होते.. "उगीच का कांताऽऽ' आणि पेटीवरून विविध प्रकारची स्वरांची नक्षी काढत आपल्याच गाण्याला साथ करीत होते... एक कडवे झाले की तबला वाजवता वाजवता वसंतराव पुढचे दुसरे कडवे गात होते. दोन देशपांड्यांची मैफल आता अगदी ऐन रंगात आली होती. .. दारात कुणाची तरी पावले वाजली. "कोण आहे?' पु. ल. "मी आहे.' ती "पण "मी' कोण? नाव, गाव, काही आहे की नाही?' "नाही ना!' "असं कसं होईल?

अवघा रंग एक झाला....

हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :) 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..' रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..! रघुनंदन पणशीकर.. 'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!

बापू सोनावणे..!

लेखनविषय:
लेखनप्रकार
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!
Subscribe to वाङ्मय