सध्या उत्सवाचे दिवस चालू आहेत कोकणात या उत्सवाला खूप महत्व त्यानिमीत्त मनात आलेला एक विषय. दत्तदासबुवा घाग हे एक अलौकिक, प्रतिभावंत, जाणकार व्यक्तीमत्व, आहे. ते मुळचे नृसिंहवाडीचे. आज बुवांची पासष्टी उलटली तरी बुवा तितक्याच उत्साहाने किर्तनाला उभे राहतात. पण हल्ली बुवांनी किर्तने कमी केली. मी अलीकडच्याच काळात त्यांच किर्तन पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या ओळखितील जाणकारांच्या मते बुवांचा आवाज पुर्वीच्या तुलनेत 30% पण राहीला नाही पण तो आवाजही आज अत्युच्च आनंद देउन जातो. पण आता वयोपरत्वे बुवांना तब्येतही साथ देत नाही. तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.