Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/01/2015 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
(या मागिल भागापासून सांधा जरा बदलला गेला असल्यामुळेच ,नविन भाग लिहायला हा बराच वेळ-गेलेला आहे.त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो.. आणि पुढे वाचायची अगत्यपूर्वक विनंती करतो. :) ) मागिल भाग- १८
याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस.

भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/01/2015 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. ) दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ!

चित्रकृती

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 06/01/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) } काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही.

मवाली भट नी पै

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 28/12/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!

उजवे - डावे प्रतिसाद ..??..

लेखक माहितगार यांनी सोमवार, 22/12/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच. एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले.

अत्तरायण..! भाग - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/12/2014 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ अत्तरायण..! भाग - २ आठ वर्षापूर्वीची घटना.. गणपतिचा पहिला दिवस.. नेहमीप्रमाणे मी माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काम अवरल्यावर आलेला चहा पीत असताना,त्या यजमानानी मला "गुरुजी हात पुढे करा!" असं फर्मावलं. मी आपला मनात,'आज यांना काहि खटकलय कि काय?' 'अथर्वशीर्ष तर सावकाशच म्हटलं होतं' वगैरे बाळबोध आत्मशंका घ्यायला लागलो.

पान,चुना..तंबाखु!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 20/12/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी:- राम राम मंडळी... मंडळी:- राम राम... काय? झाली का कामं? मी:- हो...झाली की! मंडळीतले तात्या:- या...मग बसा! .. ए गेनू.. च्या आन रे! मी:- नको राव. लै झालाय आज. चहा नको.. तात्या:- बरं..र्‍हायलं..मंग पान खा! येश्या:- का गुटखा देऊ? तात्या:- भाड्या..गुर्जिला परत गुटखा इचारला,तर तीच पुडी सारीन तुज्यात! शामू:-तात्या आज बिनपाण्यानी करणार काय येश्या'ची? .. ह्या ह्या ह्या ह्या!!! तात्या:- तसं नाय हो. पण पान कुटं..आनी गुटखा कुटं? येश्या:- बरोबर (आ)हे...आपलं त्ये पान,लोकाचा तो गुटखा! तात्या:- तुज्यायचा तोंड फुटका तुज्या...गप र्‍हा जरा.. शामू:- ख्या ख्या ख्या ख्या...

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग- १७ फक्त मंगलाष्टकांचा लाइव्ह शो...........ऐका! आणि आवडला तर या आत्मूभटाला द्या एक... . मंङ्गलाष्टक....वन्स मोअर!!! पुढे चालू... ================= पर्वा दुपारी (नेहमी सारखाच) थकून,या पूजेच्या कामाहून आलो. जेवणंही टेचुन झालवतं अगदी. म्हणून जरा एक कडक पान लावलं आणि खोलीत पंखा सोडून सतरंजीवर कलंडलो जरा...! तेव्हढ्यात दाराची कडी वाजली जोरजोरात.. कोण मेलं आलं या इश्रांतिच्या टायमाला मधे...म्हणून चिडचिडून उठलो..आणि दार उघडलं..तर समोर उभा हा आमचा काका..

अत्तरायण..! भाग - २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 10/12/2014 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। पुढे चालू..... ==================== २) अत्तरफूल :- काय वाटतं नाव ऐकल्यावर? गोंधळात पडायला होतं ना? पण हे अत्तर ज्याचं आहे..त्या फुलानीच आजवर कित्येकांना गोंधळात टाकलय. कित्येकांचे गोंधळ सोडवलेत,वाढवलेतंही! मी ही पहिल्यांदा गोंधळलोच होतो. (आणि तो गोंधळाचा प्रसंग मला पुन्हा आठवून दिला तो एका गोंधळ्यानीच!) म्हणजे ही केवळ शब्दक्रीडा नव्हे.

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.