मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली.

आयआयटीत मराठी ऐट!

एडिसन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी.

स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार

ऋषिकेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... " मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? " "स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न..

मॅडम...

फटू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दादर रत्नागिरी सवारी गाडी आपल्याच मस्तीत कोकण रेल्वेच्या सिंगल लाइनवर धावत होती... गाडी पनवेल स्थानकात शिरली. प्रवाशांचा एकच गलका सुरू झाला. गाडीतल्या प्रवाशांची उतरण्याची तर गाडी बाहेरच्या प्रवाशांची गाडीत चढण्यासाठी एकच धावपळ चालू झाली. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे गाडीच्या दरवाजामध्ये जे काही रणकंदन चालू होतं त्याचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही. एव्हधं मात्र नक्की की आमची ती कोकणी जनता एकमेकांच्या आया बहीणींना ठेवणीतल्या शब्दांत साद घालत गाडीत चढण्याचा किंवा गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होती...

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

नंदन ·
लेखनविषय:
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल. मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.

नशीब

डोमकावळा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ओ काका, काही काम देता का?" बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता. "स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता. "नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले.

नशीब

डोमकावळा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ओ काका, काही काम देता का?" बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता. "स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता. "नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले.

बंगळुरु आणि २५ जुलै २००८

यशोधरा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगळुरु सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगळुरुमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही... नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार...