Skip to main content

समाज

सुप्रभात .. शुभ रजनी ...

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/05/2012 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात .. शुभ रजनी ... कशासाठी दोस्त ? अफजलगुरू कसाब मजेत मस्त आपण महागाईने नेहमीच त्रस्त गृहिणी टंचाईत नित्य चिंताग्रस्त सामान्यांची स्वप्ने धुळीत उध्वस्त नेतेमंडळीचे दौरे कायम जबरदस्त जनतेची कमाई दलालाकडून फस्त सभागृह नेहमी गोंधळातच व्यस्त गुड मॉर्निंग... गुड नाईट... कशासाठी दोस्त ? "
काव्यरस

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

पाणी अडवा, पाणी मिळवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 10/05/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे.

खान्देशी लग्न पद्धती, चालीरिती, लग्नातील गाणी इ.

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 08/05/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो. तिथली विवाह पद्धती, चाली रिती सर्वांना माहित व्हावी एवढीच अपेक्षा.

मनाची कवाडे बंद करु नका...

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/05/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा) ................................................................................................................................. आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्‍यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात.

नारायण सान्याल आणि काही प्रश्न...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 08/05/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-N… बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले.

उपासाचा किस...(घेतला का कधी?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 07/05/2012 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ मनाशी मी हाच विचार करत होतो की उपासाला नेमका हा किस कसा चालतो..? उपासाला जड असे काहिच खायचे नसते..म्हणे! मग हे कसे चालते..? बारश्याला तेराव्याचे गाणे? खिचडी काय..नी..किस काय? हलके थोडेच असतात..होय? माणसे कशी शोधुन काढतात उपवासालाच सुखाची सोय? उपवसाला शास्त्रात म्हणे निराहार ही संज्ञा आहे पण लोक केवढा किस काढतात की पाहुन वाटतं..काय हे..? खिचडी काय...नी थालपिठं काय सगळं जडच खातात तर काहि दुसरं टोक गाठणारे पाणी पिऊन उपाशी रहातात. तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो... ज्याची त्याची अवड..! मी म्हणतो,,बा धर्मा.. आता तुझ्या अस्थी सावड धर्म ही अफूची गोळी हे वचन आज मला पटलं आणी त्यांना

जुनी गोष्ट आहे.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 04/05/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जुनी गोष्ट आहे. कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.. व लग्न हि ठरले होते तिचे. रात्री जेवण झाले की आम्ही लॉग राईडला जात असू .. दिवसभरातल्या गप्पा..पी.जे मजा यायची.. घरी जाताना कुठेतरी कॉफी असा कार्य क्रम असायचा.. मुलगी नव्या पिढीतली असल्याने सी.सी.डी वा तत्सम मध्ये कॉफी पिण्यास जाण्याचा आग्रह करीत असे.. मुळात मला कॉफी आवडत नाही..आम्ही चहा बाज.. त्यांतून जगातला सुंदर चहा फुगेवाडीच्या अशोक च्या टपरीवर मिळतो असे ठाम मत.. खर मला म्हणजे कॉफी शॉप ही नवी संस्कृती फारशी पसंत नाहि..नव्यास विरोध असे नाही पण कॉफीच्या कपाला अ‍ॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे मला पटत नाही..त्या मुळे मी त

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी गुरुवार, 03/05/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?