Skip to main content

समाज

अशात काय पाह्यलंत???

लेखक यकु यांनी शुक्रवार, 13/04/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्‍ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्‍श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्‍यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्‍याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्‍ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्‍ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत.

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

मूलींची गरज नाहीये का?

लेखक स्वप्नाळू यांनी गुरुवार, 12/04/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर एवढया टोकाचं बोलायचे नव्हते. पण एवढी टोकाची परिस्थिती नसली तरी परिस्थिती विशेष बदलली पण नाहिये. मधे मिपावर एक लेख वाचला होता - " पूरुषांची गरज काय" असा काहिसा विषय होता. पण सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून मूलींची ग र ज नाहिये कि काय असा प्रश्न मनात येतो. बँगलोर सारख्या शहरात काल एका केवळ ३ महिने वयाच्या मूलीचा -' आफ्रिन'चा तिच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीमूळे म्रुत्यू झाला. कारण का तर बापाला मूलगा अपेक्षित असताना मूलगी जन्माला आली. त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध असेल बर ? मागील वर्षी सांगली मधे एका डॉ.

(धप्पकन)

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 12/04/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

ऑनर किलिंग

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनर किलिंग (जळगाव मध्ये एका धनगर नावाच्या इसमाने आपल्या पोरीचा गळा दाबून खून केला व खुना मध्ये काका व आजी यांचा हि सहभाग आहे.) वाहिन्यांमुळे आपल्याला मिळालेला आणि रुजलेला शब्द म्हणजे ऑनर किलिंग. दोन प्रेमी जिवांच्या नातेवाईकांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी प्रेमी जिवांची केलेली हत्या म्हणजे ऑनर किलिंग अशी याची थोडक्यात व्याख्या. या भारतवर्षात एक काळ होता जेव्हा स्त्री आणि पुरुष हा भेद न्हवता.लीलावती,गार्गेयी,मैत्रेयी या विदुषींचे दाखले आपण आजही देतो."कामसुत्र" हे या देशात तयार झाले.कामसुत्राचा उल्लेख एवढ्याच्साठी की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजच्या इतका मागसलेला न्हवता कारण यातील शिल्पे आ

नीतिमत्ता

लेखक सहज यांनी मंगळवार, 10/04/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
वडीलोपार्जीत संपत्ती? मानवतेचा ठेवा? स्त्रीधनच. बहुतेक वापरु की नको? जग कुठे चालल्लेय? ---------- उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला? ----------------------- ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? -------------------------- म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या. तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नाही जाणार पळून, नाही होत मी भ्रष्ट. ज्यांनी दिले, ते अजरामर झाले. स्साली, जरा बोलू दिले, तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

सत्याग्रही...

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/04/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
( ऑगस्ट २०११ मध्ये हा लेख मी लिहिला होता. मिपावर टाकला नव्हता. आज काही कारणांनी या विषयाची आठ्वण झाली त्यामुळे ठेवणीतुन बाहेर काढला. संदर्भ काही महिन्यांपुर्वीचा असला तरी विषय त्रिकालाबादित आहे ! ) ___________________________________________________________________ 'सत्याग्रही' मोर्चांचा वणवा पसरलाय देशभर. जल्लोष आहे. चीड आहे. उन्मादही आहे. सरकारी खजिन्यातल्या करोडो रुपये लंपास करणा-या बदमाषांच्या बातम्या कानावरून वा डोळ्यासमोरून जाताना प्रत्येक वेळी जो संताप झाला होता आणि जो असहाय्यपणे, हतबल होऊन दाबून ठेवला होता त्याला अहिंसक मार्गाने मोकळे करण्यासाठी समस्त भारतीयांना एक नेतृत्व मिळालंय.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.