Skip to main content

समाज

मेरा भारत महान

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 24/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा. नुकतीच घडलेली एक घटना. माझ्या एका मित्राच्या घरी चोरी झाली. जवळपास १ लाख रुपयांचा ऐवज घरातून चोरी झाला. मित्राने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा पोलिसांनी ती तक्रार नोंदवून न घेता त्याला २ दिवसांनी ये, तोपर्यंत आम्ही तपास करू असे सांगितले.

शिकाम्बा-मशाम्बा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 19/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही. त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं. पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत.

पुन्हा पुन्हा बलात्कार

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 19/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच. आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो. मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो. त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते. आज ४ दिवस झाले त्या माउलीने जेवण घेतले नाही. शुद्धिवर नसल्यामुळे दवाखान्यात अडमिट आहे.

धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं !

लेखक मन यांनी मंगळवार, 17/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे. कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे. . . हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी. " आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो. शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो. "अमुक अमुक माणसाच्या कार्याची आंतरराष्ट्रिय सतरावर दखल घेतली गेली " म्हणजे अमेरिकास्थित/स्प

तो वेडा आहे भाग १

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 13/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो वेडा आहे ! आजपर्यन्त जितक्या वेळा मी माझ नाव ऐकलं नसेल त्याहून जास्त वेळा मी हे वाक्य ऐकलं आहे. वेडा! वेडा! वेडा!. कधी कधी वाटतं हेच आपलं नाव आहे का? नाही..नसावं. आईने कधीच मला या नावाने हाक मारल्याच आठवत नाही. कधी कधी बाबा वैतागून म्हणतात.पण लगेच आई त्यांना रागावते. माझा दादा पण नावानेच हाक मारतो. पण मग बाकी सगळे मला वेडा का म्हणतात. लहानपणी वर्गातल्या बाईंनी वेडा म्हणून मला वर्गाबाहेर काढलं. नंतर मुख्याध्यापक बाईंनी शाळेबाहेर काढलं. म्हणाल्या की कोणत्याच विषयात याची प्रगती नाही. खरं म्हणजे चित्रं चांगले काढायचो मी...अजूनही काढतो. तर म्हणाल्या की चित्रकला हा काही विषय नाहीये.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 12/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग..यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.! पुढे चालू.... ============================= तर असं हे आमचं प्रतिवार्षिक अनुष्ठान. आमच्या निरनिराळ्या गमती जमती, गुरुजिंचे आणि त्यांच्या आलेल्या मित्रांचे वादविवादांचे नाना प्रकार..धर्म अधर्माच्या चर्चा..आणि एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने कसा करावा? याचं आंम्हाला एक प्रकारचं प्रशिक्षण.., असं सर्वकाहि देऊन संपायचं.

त्या फुलांच्या गंधकोषी....सांग तू आहेस का?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्‍या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि! (मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे?

गाडी मागणाऱ्यांना कसे टाळावे?

लेखक प्रतापराव यांनी शनिवार, 07/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक सेकंडह्यांड स्पार्क.गाडी घेतली आहे. हळू हळू शिकणे चालू आहे.परंतु सध्या एक समस्या भेडसावत आहे बरेच परिचित, नातेवाईक हे गाडी मागत असतात. त्यातील काहींना आपण विश्वासाने देवू शकतो परंतु काहींना मात्र टाळायचे असते. त्यांना काहीना काही कारणे द्यावे लागतात नाहीतर शिष्टपणाचा शिक्का मारायला तयार .माझा स्वभाव हा अतिभिडस्त असल्याने सर्वांना टाळता येत नाही .पहिली गोष्ट इतरांची गाडी मागणे हे काही मला योग्य वाटत नाही. परंतु काही जन मात्र बिनदिक्कत गाडी मागतात त्यांना टाळण्यासाठी काय उपाय असतील तर सुचवावे एखाद दुसर्याचा प्रयोग करून बघावे म्हणतो .

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

चार पाच वर्षांपूर्वी लिहीलेली कविता

लेखक पिनुराव यांनी शुक्रवार, 06/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आपण फक्त बोलतो, काही तू बोलते, काही मी बोलतो, बोलत बोलत कधी हसते कधी रडते, मी हि तसाच बोलतो हसतो , पण तुला काय वाटत या लोकांना , आपल्याकडे बघून काय वाटत, तू म्हणशील सोड न यार !