Skip to main content

समाज

आरक्षणाची गरज

लेखक अन्नू
Published on शनीवार, 16/01/2016
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

साहित्यिक कसले हे !

Published on शनीवार, 16/01/2016
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

Published on शुक्रवार, 15/01/2016
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

संक्रांत आणि पतंगबाज

Published on गुरुवार, 14/01/2016
निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात. आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम.

हेलो हेलो

लेखक सस्नेह
Published on गुरुवार, 14/01/2016
‘हेलो हेलो’ ‘कोण ?’ ‘उपाध्ये बोलते.’ ‘बोला’ ‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’ ‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’ ‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’ ‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’ ‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’ ‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’ ‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’ ‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’ ‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’ ‘सॉरी उपाध्येवहिनी.

ll सत्य परिस्थिती ll

Published on सोमवार, 11/01/2016
पैसे नाहीत म्हणून ..... शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात . पण ..... पैसे नाहीत म्हणून ..... दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण सुद्धा भेटला नाही . _____________________________________ तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?

बंगाली मातीचा साजरा बुरूज

Published on रवीवार, 10/01/2016
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही. विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म

टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन

Published on गुरुवार, 07/01/2016
टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात. या दोन्हींकडे तटस्थपणे बघितलं की आपल्याला कळतं की अधिक फायदेशीर काय आहे. तरीही व्यक्तीची इच्छा, शारिरिक कुवत, असलेला वेळ, इत्यादी गोष्टीही बघाव्या लागतात. याची सुरुवात कधी, कशी होते ते बघू. उमेदीच्या वयात म्हणजे २० ते ३० वर्षे या काळात बहुतेक जण व्यायाम, आरोग्य या विषयाकडे लक्ष देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो, पण देतात साधारणपणे.

पुणे मुंबई पुणे

लेखक दिनेश५७
Published on बुधवार, 06/01/2016
पुण्याचा एक खेडवळ म्हातारा रात्री उशीरा कसाबसा सीएसटीला उतरला. प्रवासानं दमलेला, कपडेही मळलेले. फलाटावर उतरताच त्यानं कपडे हातानं नीट केले. मुंडासं डोक्यावर घट्ट बसवलं आणि आ करून इकडेतिकडे पाहात, हातातली पिशवी सावरत तो चालू लागला. मुंबईत मुरलेल्या टीसीच्या चाणाक्ष नजरेनं त्याला बरोबर हेरलं, आणि जवळ येताच हात आडवा करून त्या खेडुताला रोखलं. तिकीट दिखाओ'... टीसी म्हणाला आणि म्हातारा बावचळला. खिसे चाचपून झाले, पिशवीही उलटीपालथी केली. तिकीट सापडलंच नाही. टीसी खुश झाला. निकालो पैसे. फाईन भरना पडेगा'... टीसी म्हणाला आणि म्हातारा रडकुंडीला आला. 'बाबा रे, पैसे नही है माझ्याकडे'...

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

लेखक Anand More
Published on बुधवार, 06/01/2016
भाग १ भाग २ भाग ३ ______________________________________________________________________________________ जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.