मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

जानु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या. https://www.karnavatiuniversity.com/uid/

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

बाजीप्रभू ·
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

'रोगापेक्षा इलाज भयंकर'!

अँड. हरिदास उंबरकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'रोगापेक्षा इलाज भयंकर'! शिक्षण विभागाच्या विविध घोषणांनी शिक्षण क्षेत्र व्यथित झाले असल्याची ओरड सुरु असतानाच पुन्हा एका नव्या घोषेंनेनें प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. पटसंख्या कमी असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला असून, ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली, अशा शाळांवर आता बंदीचे गंडांतर येणार आहे. अर्थात, 'शाळा बंद' ऐवजी स्थलांतरित हा शब्द वापरून शासनाने निर्णयामागील त्रीव्रता कमी केली असली तरी. स्थलांतराचे नियम आणि अटींमध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील विध्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची श्यक्यता आहे.

विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

अँड. हरिदास उंबरकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.

हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?

साहना ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते. NCMEI हि एक घटनात्मक संस्था असून देशांत कुणाला अल्पसंख्यांक दर्जा असावा हे ठरवण्याचे अधिकार ह्या संस्थेकडे आहेत. कायद्या प्रमाणे कुणीही हिंदू ह्या संस्थेचा पदाधिकारी असू शकत नाही.

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

डॉ श्रीहास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...

कंपास पेटी

OBAMA80 ·
लेखनप्रकार

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

डॉ श्रीहास ·
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

पैठणी दिवस भाग-२

गुल्लू दादा ·
लेखनप्रकार
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

१० वी नंतर विज्ञानातले पांरपारिक शिक्षण न घेता १२वीच्या स्तराचे NIOS मधुन Sr. Secondary परिक्षा देणे कितपत व्यवहार्य आहे?

कोदंडधारी_राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पार्श्वभूमी - माझा मोठा मुलगा या वर्षी इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याला ६२ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या बरोबर सर्व क्षेत्रातील पुढील संधी जसे विज्ञान, वाणिज्य व कला इत्यादी क्षेत्रातील पर्याय चर्चा करुन झालेले आहेत. त्याच्या मतानुसार त्याला विज्ञान क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्याने पुण्याच्या ११ वी च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नांव नोंदवून चारही पेऱ्यांमधुन अपेक्षित असे चांगले कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध झाले नाही.