Skip to main content

शिक्षण

शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 12/06/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्‍या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील... ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट... ( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)... . .. हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...

मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 26/05/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 19/05/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...

(किंमत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 05/05/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं) कारणे होतीचं तशी लिहायला प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या प्रश्न हा साधाच होता पण तरी लागला तो काहीतरीच कारणे द्यायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे) काळजी त्यांची नका करू एव्हढिही की काळजी लागेल ही खटकायला बंद कधीही नाही केले मी उमलायचे आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला भाव नाही तुला थोडासाही दिला काजवे लागले दिवसाचं चमकायला माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी जेव्हा भूक ही लागेल बोलायला

अपयशाचे व्यवस्थापन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/04/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!

मोहरवणी..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक! मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!

अनोखे वंशवृक्ष

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 02/04/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.