Skip to main content

शिक्षण

मराठी अभ्यास केंद्र : उद्घाटन

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 26/02/2009 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
स.न.वि.वि. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. ग्राममंगलच्या पुढाकाराने राबविण्यात येणा-या द्विभाषा प्रकल्पात मराठी अभ्यास केंद्राचा सहभाग असणार आहे. त्या प्रकल्पाचे कामही या कार्यालयातून चालणार आहे. प्रसिद्ध चित्रकार श्री. सदाशिव कुलकर्णी यांनी परिश्रमपूर्वक या कार्यालयाला नवीन साज चढवला आहे. महाराष्ट्र फौंडेशनच्या मदतीने कार्यालयाचे संगणकीकरण झाले आहे.

नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 24/02/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
बंधु-भगिनींन्नो, आज किनई, मी तुम्हाला एक नवीनच पाककृती सांगणार आहे. माझ्या आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांवरच्या आजवरच्या अनुभवातून हा पदार्थ जन्माला आला आहे. मात्र करायला अगदीच सोप्प्पा आहे हं! अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल...... सर्वप्रथम एक पसाभर मराठी शब्द विकत घ्यावेत.

एक संवाद !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर, नमस्कार ! ओळखलं का ? असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो. आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले. पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते! सर, तुमच्या लक्षात कसे राहील?

शिक्षणात हवे आहेत बदल

लेखक त्रास यांनी रविवार, 15/02/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत जे घडते ते म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या अनेक गोष्टी आयुष्यात लवकर करता येतात. असे अनेक चांगले शिकलेले लोक की ज्यांना शिकविण्याची आवड असेल त्यांना शाळांतुन Guest Teacher करुन तास घ्यावेत. ह्यासाठी शाळांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे. वरील बदलाचा परिणाम मुलांवर तसेच शिक्षकांवर वरही पडेल व त्यांना प्रोफ़ेशन, व इतर हजारो बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. २. असेच Guest Teacher तुम्हाला निवृत्त शिक्षकांतही दिसतील.

अजितकाका

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 06/02/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता” esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला 'होता' हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !” दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात !

सोळावं वरीस धोक्याचं..!

लेखक पारोळेकर यांनी गुरुवार, 05/02/2009 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्याच्या दिशेने झुकणारे वय... सोळावे वरीस ! तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात. एका बाजुला अभ्यासाचा ताण व दुसरीकडे 'तो' तिच्या व 'ती' त्याच्या, आठवणीत रात्र जागून काढत बसावं लागते. या वयात जे काही होतं ते तरूण-तरूणींनी अनुकरणातून शिकले असतात. कारण त्यांना या गोष्टीचा फारसा अनुभव आलेला नसतो. तरूण्याची पहिली पायरी समजणार्‍या सोळाव्या वर्षात स्वत:ला जेवढे जपले तेवढे कमी असते. या वयातच तरूण-तरूणी अधिक घसरतात. ज्याला सावरता आले़ त्याचेच करियर उज्ज्वल होते. नाही तर 'घडीचे घड्याळ' व्हायला वेळ लागत नाही.

आपले दुरावलेले बांधव - रोमा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 05/02/2009 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.

मनाच्या कुपितले-निरोप

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 04/02/2009 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मनाच्या कुपितले या सदरातला हा सहावा लेख मनातले थोडेसे-माझ्या गेल्या लेखावर त्यातील लिखाण शैलीवर खुप साधक बाधक चर्चा झाली .या चर्चीतुन मी स्वतःला सुधारीन असे नकी सांगतो.यातुन एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे माझ्या लेखनाचे दोन प्रकार पडतात एक स्वतःसाठी केलेले आणि दुसरे जे लोकाना वाचायला आवडेल असे ! यापुढे मी लोकाना आवडेल असे लिखाण द्यायचा नकी प्रयत्न करीन पण आतापुरत्ये मला माफ करा हे लिखाण मी" स्वान्त सुखाय |" लिहिले आहे .

मिपा मुखपृष्ठ: अभ्यंकर वहिन्या ते बाबूजी!

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार! वीर सावरकर बनवताना बाबूजींनी वर्षानुवर्षे एक तपश्चर्याच केली. तिची माहिती सर्वसाधरणपणे मराठी जनतेला नाही. मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत.

निमित्य घटोत्कचाचे...

लेखक एकलव्य यांनी गुरुवार, 25/12/2008 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्याची तिरंदाजी - ०८
"पण कशावरून?" हा किडा कशाकशाच्या बाबतीत आणि कधीकधीपासून डोक्यात वळवळायला लागला हे नेमके सांगता येणार नाही. या किड्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न तूर्तास बाजूला ठेवून एकलव्याने आज घटोत्कचाच्या भेटीला जायचे ठरविले आहे. त्यातही ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय रंग लागू न देता शक्यतोवर निव्वळ भौतिक आणि भौमितिक अंगाने या भेटीकडे पाहावे अशी खूणगाठही त्याने आजसाठी मनाशी बांधली आहे.