Skip to main content

शिक्षण

(किंमत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 05/05/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं) कारणे होतीचं तशी लिहायला प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या प्रश्न हा साधाच होता पण तरी लागला तो काहीतरीच कारणे द्यायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे) काळजी त्यांची नका करू एव्हढिही की काळजी लागेल ही खटकायला बंद कधीही नाही केले मी उमलायचे आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला भाव नाही तुला थोडासाही दिला काजवे लागले दिवसाचं चमकायला माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी जेव्हा भूक ही लागेल बोलायला

अपयशाचे व्यवस्थापन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/04/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!

मोहरवणी..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक! मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!

अनोखे वंशवृक्ष

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 02/04/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शिक्षक दिन

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 02/01/2008 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिली आहे. पाच सप्टेंबर दिन उजाडला जाऊ सत्काराला शिक्षकांच्या शाळा रंगवली हार मागविले गळ्यात घातले पुढार्‍यांच्या. करूनिया स्मित स्वारी पुढे आली भाषणास केली सुरुवात तास सव्वातास भाषण सुंदर दारुबंदीवर त्यांनी केले. त्यांच्या पाठोपाठ दुजा उठे कोणी गरिबीचा त्यांनी नारा दिला. गरिबांच्या पाठी म्हणे कोण आहे शल्य बोचते हे अंतरात तसेच दाबून धरून हृदय संपवी वक्तव्य दीनांसाठी. शेवटी म्हणाले अध्यक्ष सन्मान्य केले उपकृत बोलावून. आम्हावरी लोभ ठेवावा असाच पुढल्या खेपेस येऊ खास. शिक्षक दिनाचा ऐसा सोहळा भ्रमाचा भोपळा नित्य हाती! कविता संग्रहः शब्द मना
Taxonomy upgrade extras