मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.
काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया
उदा...
मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक
आपल्याला आठवणार्या शब्दांची आपण भर घालावी
---
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २
भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही.
(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच..
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला
वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले
ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा
"भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा
"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"
मित्रहो,
आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.
मला ओळखणार्या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय.
त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय.