कोचिंग क्लासेस -२

लेखनप्रकार
कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां.

डॉ. संजय ओक

लेखनप्रकार
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...

लेखनप्रकार
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो. असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते.

व्यसनाधीनता व उपचार........

अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली. निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला.

INDIA UNBOUND

लेखनप्रकार
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.
Subscribe to शिक्षण