एक दिवस भटकंतीचा: स्मरणरंजन
मी, मनोज आणि त्याची पत्नी मधु अश्या तिघांनी भटकायला जायचे ठरवले (अर्थातच बाकीच्या मित्रांना वेळ नव्ह्ता). ताम्हिणी घाटात जायचा बेत ठरला.३ ऑक्टोबर ०९ ला आम्ही तिघांनीही सकाळी १०.३० वाजता पुणे सोडले तेही अर्थातच मनोजच्या स्विफ्ट गाडीने. आकाश अंशत: ढगाळ होते. पिरंगुट, पौड मागे टाकून आम्ही दीड तासात मुळशी ला पोहोचलो.सर्व परिसर तेरड्याच्या जांभळ्या आणि सोनकीच्या पिवळ्या सोनेरी फुलांनी भरून गेला होता. पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे अशी गावे पार करत आम्ही ताम्हिणी घाटाच्या तोंडावर जाऊन पोहोचलो.
याद्या
5436
मिसळपाव
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.
त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं...