Skip to main content

प्रवास

लुटा लुत्फ विसापुरचा अर्थात वाटा चुकत चुकत केलेल्या ट्रेकचा वग

लेखक झकासराव यांनी रविवार, 21/03/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये लोहगडला जाउन आलो. दुवा तेव्हाच विसापुर बघुन तिकडे जायच नक्की केल. पण ह्या ना त्या कारणाने ते पुढे ढकलतच गेल. मग एके दिवशी काही मित्रानी बाहेर जाउन खा खा खादाडी करण्याचा कार्यक्रम करुया का अस विचारल होत. त्यावर मी माझ्या वाढलेल्या ढेरीकडे बघत त्याआधी एक किल्ला बघुन येवु मगच खादाडी करु अशी एक "पोट"सुचना (:D) दिली. चारजण तयार झाले. आणि मग रविवारी सकाळी ७ चा मुहुर्त (मीच) ठर(व)ला. आणि मीच ७:३० ला निगडी चौकात गेलो. (पर्फेक्ट आयएसटी :D ) तिथुन निघालो.

अर्ध्या तासाचा फरक

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 20/03/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!

रायरेश्वर आणि केंजळगड

लेखक बज्जु यांनी सोमवार, 15/03/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्याहून रात्री १२.०० ची महाड्-पिंपळ्वाडी एस्.टी. पकड्ली. पहाटे ५.०० ला महाड्ला आलो. महाड आणि पूणे यांना जोडणार्‍या वरंधा घाटातून पुढे जाणार्‍या एस्.टी. ने हिरडोशीला आलो. साधारण ८.३० वाजले होते. ईथूनच आमच्या ट्रेकला सुरूवात होणार होती.

दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती

लेखक Manish Mohile यांनी गुरुवार, 11/03/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ चा ऑगस्ट महिना. आम्हाला रक्षाबन्धन, स्वातन्त्र्यदिन व त्याला लागून रविवार अशा लागोपाठ तीन सुट्ट्यान्चा दुग्धशर्करा योग जमून आला होता. त्याचा फायदा घेऊन आम्ही दीऊ ला जायचे ठरवले. अहमहदाबादपासून दीऊ साधारण ५०० कि.मी. आहे. अहमदाबाद-भावनगर-उना-दीऊ असा साधारण मार्ग आहे. १४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो.

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 11/03/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच. थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला.

मदनगड

लेखक बज्जु यांनी सोमवार, 08/03/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मदनगड या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ?? ~X( तिथे काय ठेवलयं ? :''( वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत #:S वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत.

स्वारी गोरखगडावर

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 06/03/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्‍याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा.

अपरिचीत किल्ले: अनघई आणि म्रुगगड

लेखक बज्जु यांनी शनिवार, 06/03/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले. शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम.

राजगड... गुंजवणे दरवाज्याने

लेखक विमुक्त यांनी रविवार, 28/02/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोनीदा म्हणतात तसं "राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड" राजगडावर जायला वाटा अनेक... पालीहून पाली दरवाज्याने... वाजेघरहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने... गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने... गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने... गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने... भुतोंड्याहून अळू दरवाज्याने... पैकी पाली दरवाजा, अळू दरवाजा आणि पद्मावती माचीवरचा चोर दरवाजा ह्या वाटा आता वापरात आहेत... सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने तर आता कुणीच चढत नाही आणि गुंजवणे दरवाज्याने सुध्दा फारसं कुणी जात नाही...