Skip to main content

प्रवास

जाता सातार्‍याला . . . . .

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 04/06/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी.

विलोभनीय नायगरा!

लेखक मीली यांनी शुक्रवार, 04/06/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना!

आपला प्रवास ........पर्यावरणाचा र्‍हास

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 03/06/2010 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची रिमझिम सुरू होताचे शहरवासियांना वेध लागते ते वर्षा सहलीचे. पावसाचे आणि निसर्गाचे नाते तसे अतुटच. पावसाळ्यात काय करायचे? याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. बाहेर पाऊस पडत असताना कुणाला घरी जुनी गाणी ऐकत मस्त कांदाभजी फक्कड चहाबरोबर खायला आवडतो, तर कुणाला मित्र मैत्रींणीसोबत धबधब्यात, धबधब्यातल्या पाण्यात स्वच्छंदी धमाल करायला आवडते, तर काहींना सह्याद्रिच्या कुशीत फिरायला.

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/06/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला. आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.

श्री क्षेत्र भुलेश्वर..अद्भूत शिल्पसौंदर्य

लेखक येडाखुळा यांनी बुधवार, 02/06/2010 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना भुलेश्वरचं दर्शन घडवण्याचा मानस आहे. सासवड पासून साधारण २६ (?) कि.मी. वर आहे हे मंदिर.पुणे - सोलापूर रस्त्यावरून यवतच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिकडूनही एक रस्ता आहे. हे मंदिर आहे यादव काळातलं. अतिशय देखणी शिल्पं असलेलं. जगरहाटीपासून दूर घेऊन जाणारं, गूढरम्य... इथे गेल्यावर कसलीतरी अनामिक धुंदी चढते...स्वत:ला विसरून जातो आपण अगदी. असं वाटतं की तिथल्या मूर्तींकडे आपण पाहण्यापेक्षा भूतकाळाचा पडदा दूर करून त्याच आपल्याशी बोलायला उत्सुक असाव्यात. भारून जाणे, मंत्रमुग्ध होणे...छे..शब्दच सापडत नाहीत.

तिकोना

लेखक हर्षद आनंदी यांनी मंगळवार, 01/06/2010 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी अचानक वळीव बरसला. ऑफीसमध्ये काचेच्या तावदानातुन शांतपणे बघण्या पलिकडे काही करणे शक्य नव्हते. वाकुल्या दाखवत पडणारा पाऊस, मृदगंध पसरवुन जीवाची घालमेल करुन गेला. नकळत बोटे भ्रमणध्वनी वर फीरायला लागली, कुणा़कुणाला फोन लावायचा याची यादी मेण्दुत तयार होती.. साला पण कुणालाच वेळ नव्हता. एवढ्या लवकर कुठेही जायचे नाही असे ठरवल्याने प्रत्येक जण कशाना कशात अडकला होता. शेवटी ओंकारला फोन लावला, पण त्याने सुध्दा निराशा केली. वैतागलेल्या मनाने घरी आलो, जयवर्धेनेच्या शतकी खेळीने पुन्हा एकदा फील गुड आला आणि ताणुन दिली.