मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

किती सत्य आहे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार." त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.

आगे बढो

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का "आगे बढो" म्ह्टलं तर किती बरं होईल. " हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे. हे शहरात जास्त होत असतं.

नाहीतर माणूस कंप्युटरसारखाच असता.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता"असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही. त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे!

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता. मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता. आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला. म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?. बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले.

'वाघ्या'

राधा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वाघ्या नावातच कस दमदार व्यक्तिमत्व झळकत ना. अहो .....होताही तो तसाच दमदार, भरभक्कम , निधड्या छातीचा. तो दिसला की कोणाची बिशाद नव्हती त्याच्यासमोरुन चालण्याची. नावाप्रमाणेच अंगावर वघासारखे कातडे, झुबकेदार शेपुट, तिक्ष्ण नजर अन भुंकला तरी वाघाने डरकाळी फोडावी तसा आवाज. हो असाच होता आमचा इमानी कुत्रा 'वाघ्या'. वाघ्या ची आमच्या घरात entry तशी मजेशीरच झाली. माझ्या बाबांना प्राण्याविष्ई खुप प्रेम, खास करुन कुत्रा अन मांजर अगदी उंदीर सुध्दा.

मी शिकले माझ्या वडलांकडून

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण." ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते. मला म्हणाली, "काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती.

इट मेक्स सम सेन्स.......आठवण.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिला मला म्हणाली, "मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण-शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा." असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती. मी म्हणालो, "शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे." शिला म्हणाली, "चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवर्‍याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती. "बाळं " म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो.

आमचे मित्र श्रीयुत "मी,माझं,मला"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो.