मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

मासे पण शिकवतात

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आयुष्यात येणार्‍या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवर्‍यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणार्‍या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीजरिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं "काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?" तो म्हणाला "होय.

"लाख चूका असतील केल्या"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं,पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस,आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या.

"उघड्यावरची' कारवाई

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
थेट मंत्रालयातून आलेलं फर्मान बघून वरिष्ठ आरोग्य अधिकारी मानकामे हडबडलेच. एकतर नुकतीच दुपारच्या भरपेट जेवणानंतर त्यांना डुलकी लागत होती. चहा प्यायला कॅंटीनमध्ये जायला अजून वेळ होता. टेबलावरचा फायलींचा ढिगारा थोडासा बाजूला सारून त्यांनी मस्त निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. बाकी, सरस्वतीशी लहानपणापासून कधीच जमलं नसलं, तरी सरकारी कार्यालयात चिकटल्यापासून निद्रादेवीशी मानकाम्यांनी चांगलंच जुळवून घेतलं होतं. मागल्या दारानं चोरपावलांनी लक्ष्मीही अधूनमधून पाणी भरत होती. जनू जमदाडे शिपायानं आणलेल्या अर्जंट टपालामुळे मानकामे जाम वैतागले. ""काय आहे?

काळ्या ढगाभोवतालची चंदेरी किनार

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते." असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.

भटका कुत्रा

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भटका कुत्रा . पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..

आदर करण्याची कदर

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे." ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती. एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं. त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत ग

अज्ञातवासातला एक पांडव..अर्जून (दिगसकर).

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी?

`यू टर्न'

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय... समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

पुष्कर ·
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.

दाजी "पोष्टमन"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली.दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली. भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार. दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती.जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणं कठीण होवू लागलं. दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर