प्रेमाच्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता यावर तासाची बेल वाजेपर्यंत व्याख्यान देइल.जर कोणा मध्यमवर्गीय (अर्थातच व्ही आर एस वाल्या) मराठी माणसाला विचारल तर तो म्हणेल दर साल दर शेकडा ८ टक्के दराने वाढते तेच खरे प्रेम. जर कोणा चित्रपट कलाकाराला विचारल तर तो म्हणेल ' दर वर्षी जे बदलते (म्हणजे प्रेम, प्रेयसी नव्हे) तेच प्रेम होय'.