विश्वासराव सरपोतदार, एक प्रथीतयश लेखक. विशेषतः 'प्रवास वर्णन' आणि 'व्यक्तीचित्रण' ही त्यांची खासीयत. त्यांच्या लिखाणाची सहज शैली वाचकांना भूल पाडत असे. पण गेले काही महीने, ते अगदी अज्ञातवासात गेलेले. नेहेमीच्या धकाधकी पासून एकदम दूर. अगदी थोड्याच दिवसांची गोष्ट होती. काही दिवसांनी ते आपला नविन संग्रह प्रकाशीत करणार होते- 'भय' कथांचा. भय कथांतले जवळ जवळ सगळेच विषय त्यांनी पिंजून काढलेले. रात्रीचे पडघम, सैतान, काळी मांजर , अघोरी विद्या, तांत्रीक, पछाडलेला वाडा .... सगळे म्हणजे अगदी सगळेच. आता एक 'शेवटची' गोष्ट लीहायची. म्हणजे १० गूढकथा/ भयकथांच्या पूस्तकांचा संचच ते प्रकाशना करीता देणार होते.