Skip to main content

कथा

बाजार स्वप्नांचा!

लेखक वेणू यांनी शनिवार, 14/04/2012 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वप्नांचा बाजार" नाव वाचताच रहावलं नाहीच, आत डोकावून पाहण्याचा मोह आवरला नाहीच गेला. एका छान निळसर प्रवेशद्वाराला ताज्या- टवटवीत फुलांच्या माळांनी सुशोभित केले होते. त्या द्वारावर ही पाटी होती... आत बरीचशी माणसं दिसत होती..घड्याळ्याकडे लक्ष गेलं रात्रीचे ११ वाजत आले होते, त्या बाजाराच्या सुशोभित द्वारावरच यात येण्याच आवाहन होतं...! धुंद व्हावं, हवेवर अगदी तरंगावं असा मोहक गंध पसरलेला होती आत सर्वत्र.. अगदी प्रचंड रोषणाई चहुकडे ...

मिथक

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 13/04/2012 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. सकाळच्या आठाचे ठोके पडायला सुरुवात झाली. एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.

काळ कोठडी (भाग ३)

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. .. ... उषा गेली त्याला खूप वेळ झाला, वाट बघता बघता राहुलला झोप कधी लागली समजलेच नाही. अचानक जाग आली त्याला, डोके जसे बधीर झाले होते.. काळामिट्ट अंधार.. तो जोरात ओरडला, पण आवाज घशातच अडकला. चाचपडत, अदमास घेत त्याने पाण्याचे भांडे शोधायचा प्रयत्न केला..ठ्न्न.. जोरात भांडे खाली पडले, रिकाम्या खोलीत आवाज जास्तच घुमला.

आम्ही आणि स्वाईन फ्लु

लेखक चाफा यांनी गुरुवार, 12/04/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय ********** " येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली. " अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली. हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’. या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय.

एका तलवारबाजाची कहाणी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/04/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

चिउ आणि काऊ

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्र

सन २१९८ सालच्या दैनिकातिल एक लेख.

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
तर २१व्या शतकातिल काही मंडळींचा प्रमुख उद्योग लोकांच्या मुड्या मुरगळुन पैसा कमावणे होता.पैसा म्हणजे कागदावर छापलेली चित्रे.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

भ्रमणकक्षा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 08/04/2012 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
लाल मुंडासे घातलेल्या धनगराच्या पोराने आपली मेंढरे पुढे काढण्यासाठी हाळी घालावी तसे त्या कंडक्टरने ८ जानेवारी १९८० रोजी त्या बसमधील मेंढरांना हाळी दिली “ चला स्वारगेट्ला उतरणार्‍यांना पुढे येऊ देत. चला ! लवकर ! टिंग टिंग आवाज झाला आणि बस थांबल्यावर अनेक मेंढराच्या मागे अजित प्रधान अलगद त्या बसमधून जमिनीवर आला. शांतपणे त्याने रिक्षाच्या दिशेने पावले टाकली. त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या शब्दकोशात “कदाचित” हा शब्दच नव्हता असे म्हणायला हरकत नाही. कदाचित असे होईल, कदाचित तसे होईल, कदाचित रिक्षा मिळणार नाही, कदाचित मिळेल असे अनिश्चित त्याच्या आयुष्यात काही राहिलेले नव्हते.