Skip to main content

कथा

काळ कोठडी (भाग ३)

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. .. ... उषा गेली त्याला खूप वेळ झाला, वाट बघता बघता राहुलला झोप कधी लागली समजलेच नाही. अचानक जाग आली त्याला, डोके जसे बधीर झाले होते.. काळामिट्ट अंधार.. तो जोरात ओरडला, पण आवाज घशातच अडकला. चाचपडत, अदमास घेत त्याने पाण्याचे भांडे शोधायचा प्रयत्न केला..ठ्न्न.. जोरात भांडे खाली पडले, रिकाम्या खोलीत आवाज जास्तच घुमला.

आम्ही आणि स्वाईन फ्लु

लेखक चाफा यांनी गुरुवार, 12/04/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय ********** " येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली. " अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली. हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’. या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय.

एका तलवारबाजाची कहाणी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/04/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

चिउ आणि काऊ

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्र

सन २१९८ सालच्या दैनिकातिल एक लेख.

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
तर २१व्या शतकातिल काही मंडळींचा प्रमुख उद्योग लोकांच्या मुड्या मुरगळुन पैसा कमावणे होता.पैसा म्हणजे कागदावर छापलेली चित्रे.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

भ्रमणकक्षा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 08/04/2012 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
लाल मुंडासे घातलेल्या धनगराच्या पोराने आपली मेंढरे पुढे काढण्यासाठी हाळी घालावी तसे त्या कंडक्टरने ८ जानेवारी १९८० रोजी त्या बसमधील मेंढरांना हाळी दिली “ चला स्वारगेट्ला उतरणार्‍यांना पुढे येऊ देत. चला ! लवकर ! टिंग टिंग आवाज झाला आणि बस थांबल्यावर अनेक मेंढराच्या मागे अजित प्रधान अलगद त्या बसमधून जमिनीवर आला. शांतपणे त्याने रिक्षाच्या दिशेने पावले टाकली. त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या शब्दकोशात “कदाचित” हा शब्दच नव्हता असे म्हणायला हरकत नाही. कदाचित असे होईल, कदाचित तसे होईल, कदाचित रिक्षा मिळणार नाही, कदाचित मिळेल असे अनिश्चित त्याच्या आयुष्यात काही राहिलेले नव्हते.

" माझी माय .......!!"

लेखक जेनी... यांनी शनिवार, 07/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काय कमावलं अन काय गमावलं ,ह्या एकाच प्रश्नाच उत्तर माणूस शेवट पर्यंत शोधत शोधतच वाट चालत रहातो .काही वळणावर थांबतो विसावा घेतो अन पुन्हा चालू लागतो .बस फक्त चालताना कुणाच्यातरी मायेचा हात ,कुणाच्यातरी प्रेमाची साथ एवढ मात्र कायम सोबत राहावं अशी अपेक्षा न चुकता करतो .माझ्याही पाठीवर असाच एक हात ,अशीच एक साथ , माझ सर्वस्व ,माझी माय .. अजून आठवतो ,बाबा गेले तो दिवस .मला जास्त कळत नव्हत पण माईच्या डोळ्यातन वाहणारे दुखाचे लोट , वाफाळणारे अश्रू माझ्या गालावरण खाली वाहत होते .माईला घट्ट मिठी मारून बसलो होतो मी कारण माई सारखी बाबांच्या छातीवर जोरजोरात मारत होती .मला जाम भीती वाटली तेव्हा .माईच्या

काळ कोठडी (भाग -२)

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 06/04/2012 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग अजून राहुलला जगायचे होते.. वर्षानुवर्षे जगायचे होते.. नियती पुढचा खेळ मांडत होती, साऱ्या सोंगट्या आत्ता जवळ येत होत्या..... "बेटी, बहोत दर्द है क्या जीवन में ..मुक्ती चाहिये?".. अनाहूत प्रश्नांनी उषा भानावर आली. विचार करता करता त्या रस्त्यावरच्या बाकड्यावर तिचा डोळा लागला होता.तिचीच तिला लाज वाटली. पदर सावरून घेत तिने समोर पहिले. तिची धांदल पाहून तो म्हातारा गालातल्या गालात हसत होता. ती फणकारयाने म्हणाली.. "आप की कुछ तकलीफ, अपना रस्ता नापो, चलो बडे आये मुक्ती देणे वाले" .. आणि निघणार तोच म्हाताऱ्याने तिचा हात पकडला..