Skip to main content

कथा

होस्टेलमधील पहिला दिवस.

लेखक जोयबोय यांनी सोमवार, 25/06/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो. तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते. तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते. त्यातले दोघे माझ्याच वर्गातले.

शेरास सव्वा शेर

लेखक जोयबोय यांनी शनिवार, 23/06/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्याघट्नेवर आधारीत एका गावत गावकर्यांनी महराज श्रीश्रीश्री बाबांचे सत्संग आयोजित करायचे ठरवले. गावकर्यांच्या विनंतीवरुन १० दिवस सत्संगाचे आयोजन केले. त्या सत्संगाला एक सुट्बूट घातलेला भक्त नियमीतपणे हजेरी लावत होता. तो रोज आपल्या मर्सीडीज गाडीने येत असे आणि भक्तीभावाने बाबांची प्रवचने ऐकत असे. सत्संगाच्या शेवटच्या काही दिवसात त्याने एका चेल्याला बाबांना भेट्न्याची इछ्छा व्यक्त केली. चेल्याने थोदे आढेवेढे घेतले.

प्रार्थना

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 22/06/2012 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती. " किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो!

रत्नहार...........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 20/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नहार............. अबोली साने म्हणजे नाजूक सौंदर्याचा एक सर्वोत्तम नमूनाच. नासीफ, चंका, कालिदासांच्याही प्रतिभा कमी पडावी असे तिचे सौंदर्य मग आम्ही कुठे पडावे त्या भानगडीत.. पण म्हणतात ना देवाच्या दरबारात न्यायच नाही. ही नाजूक मुलगी ऐश्वर्यात लोळायची सोडून एका कारकूनाच्या पोटी जन्माला आली आणि आमच्या या नायिकेनेही बापाच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून एका डिप्लोमा होल्डरच्या गळ्यात माळ घातली. नाहीतरी लग्नाच्या बाजारात तुमच्या आर्थिक परिस्थितीला फारच महत्व असते. तर अबोलीचा नवरा एका मोठ्या कंपनीत शिफ्ट सुपरवायझर म्हणून कामाला होता.

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

रमेश व सुरेश

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 10/06/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश. अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!