Skip to main content

कथा

मनरक्षिता (२)

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 25/06/2013 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनरक्षिता (१) चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला. तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.

बदला !

लेखक चाफा यांनी सोमवार, 24/06/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
पलंगावर पडल्या पडल्या मी भिंतीवरच्या पालीच्या हालचाली न्याहाळत होतो. हळूहळू ती पाल समोरच्या नाकतोड्याकडे सरकत होती आणि तिच्या अस्तित्वाची जाणीवही नसलेला नाकतोडा एकदम शांत होता. अचानक पालीने त्याच्यावर झडप घातली आणि आपल्यावर येणार्‍या संकटाची त्याला कल्पना येण्यापूर्वीच तो तिच्या जबड्यात तडफडत होता. मी ही किरणवर असाच अनपेक्षितपणे घाला घालणार होतो. मार्ग सुचत नव्हता पण किरणला संपवण्याचा निश्चय मी पक्का केला होता. किरण आणि मी तसे जुने मित्र म्हणजे जिवलग म्हणता येणार नाही पण दोन मिनिट थांबून बोलण्याइतपत नक्कीच. आमची मैत्री जास्त वाढायला कारण ठरली ती मधुरा, माझी आणि किरणची कॉमन मैत्रीण.

सावली

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 21/06/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी मुंबईला येणा-या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं! थकल्याभागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं काही तिचं आयुष्य लांबलचक नव्हतं – अवघी सतरा वर्षाची तर होती ती. हं, आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं . पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला, आणि तिने ती घेतली होती.

मनरक्षिता ( १)

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 20/06/2013 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे पिंगट तपकिरी डोळे भयाने विस्फारले होते. घामेजलेल्या कपाळावर तांबूस भुऱ्या केसांच्या बटा चिपकून बसल्या होत्या. घशातून बाहेर पडू पाहणारा हुंदका ओठावर दाबून धरलेल्या तिच्याच हाताच्या पंजाने शर्थीने रोखून धरला होता. समोरच्या दृश्याचा अर्थ लावण्यात तिच्या आठ वर्षाच्या चिमुकल्या मेदुला अपयश येत होते. पण चालले आहे ते काहीतरी भयंकर आहे अन आपण आवाज न करता गप्प बसण्यातच शहाणपणा आहे, इतके तिला नक्कीच उमजत होते. दानम्माच्या देवळाच्या अंधाऱ्या ओवरीत ती एका कोपऱ्यात दबकून बसली होती. अन ते चार धटिंगण देवळामागच्या त्या निर्मनुष्य मंडपात, संध्याकाळच्या संधिप्रकाशात तिच्या आईच्या अंगाशी झोंबत होते.

सावली !

लेखक चाफा यांनी सोमवार, 17/06/2013 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचा शेवटच मुळात तुमच्या कल्पनेवर सोडलाय,त्यामुळे जर आपापल्यापरीनं शेवट जोडलात तर खरंच मजा येईल. ******** अखिलेश उर्फ अखी, मुळातच एक माथेफीरू माणूस. किमान त्याचे मित्र तरी हेच म्हणायचे. वडलांचा यशस्वी व्यवसाय, अभ्यासातली गती असं सगळं असूनही त्यानं जेंव्हा त्यानं डिफेन्स सर्व्हीसमधे जायचा हट्ट धरला तेंव्हा कुणालाच त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. सगळ्या प्रक्रीया पुर्ण करून तो नेव्हल एअर आर्म्सला जॉईन झाला आणि नंतर मित्रांच्यातलाही त्याचा संपर्क कमी होत गेला. दोन-एक वर्षापुर्वी त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी धडकली तेंव्हा मात्र सगळेच हळहळले. घरी सांत्वन करण्यासाठी रिघ लागली.

चिनी साम्राज्य

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 14/06/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली.

कमिशनर- जेफ्री आर्चर (उत्तरार्ध)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 13/06/2013 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्रः कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध) (या कथेचा हा भाग आधीच टाकला होता परंतु मिपाच्या गेल्या काही दिवसांच्या पडझडीत गायबलेला दिसतोय कथा पूर्ण असावी केवळ याच हेतूने हा भाग पुन्हा टाकत आहे). मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली.

कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 30/05/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
जेफ्री आर्चरच्या 'कमिशनर' कथेचा स्वैर अनुवाद.... "कशासाठी तो माझ्या भेटीची वेळ मागतो आहे?" कमिशनर साहेबांनी विचारले. "तो म्हणत होता काही खासगी काम आहे" "त्याला तुरुंगाबाहेर येऊन किती दिवस झाले?" कमिशनर साहेबांनी पुन्हा विचारले. "दीड महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटला आहे." राज मलिक ची फाईल पाहत सचिवाने उत्तर दिले. कमिशनर नरेश कुमार आपल्या खुर्ची वरून उठले आणि काहीतरी विचार करीत आपल्या खोलीत येरझारा घालू लागले. एखाद्या गहन विचारात असले म्हणजे त्यांच्या कडून ही कृती अगदी अभावितपणे होत असे.

बटाटा भाजी

लेखक आतिवास यांनी बुधवार, 29/05/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय. आत्याची म्या लाडाची हाय. सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली. म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?” आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं. तरीबी म्या न्हाई म्हनून रायली. मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.” लई झ्याक बगा. आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई.