Skip to main content

जीवनमान

वैशाख वणवा

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 18/04/2018 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग नावाचे काहीतरी आहे, याचे भान आम्हाला फक्त फेसबुकवर फोटो पोस्ट करताना, शनिवार रविवारी फिरायला जाताना, फोटो लाईक करतानाच होत असते.

"इलेक्ट्रॉनिक्स!!!!"

लेखक उपयोजक यांनी रविवार, 15/04/2018 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मे आय कम इन सर?" "येस, प्लीज" "थँक यू!" "आकाश देशमुख! बरोबर?" "हो सर." "आपण बोललो होतो फोनवर" "हो" "ते मिस्टर दातार ज्यांच्या रेफरन्सने तुम्ही आलायंत ते तुमचे कोण?" "ते बाबांच्या अॉफिसात आहेत." "अच्छा!" "बरं! तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मधे काय केलंयत?" "मी BE केलंय सर Electronics ब्रँचमधून" "अरे बापरे! इलेक्ट्रॉनिक्स?" "हो सर.का? काय झालं?" "अरे यार !

तुमच्या देशात....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 13/04/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते.

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 10/04/2018 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’.

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 03/04/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.

अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 03/04/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे. मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी... -- युयुत्सु ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D: Rajeev Upadhye, asked me to look into his write up for this forum on epigenetics.

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/03/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही.

एका अवलियाची भेट

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/03/2018 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. २१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.