Skip to main content

जीवनमान

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .

आवारगी .....

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी ! कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!! गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली.

चाळीशी ……… गद्धे पंचविशी

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 25/02/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात अनेक वाढ दिवस साजरे झाले . चाळीशीत गेलेल्या सोबत्यांचे अभीनंदन सार्वजन मिळून करत आहेत.खरच चाळीशी झाली की आपला या जगाकडे बघायचा नजरियाच बदलतो नाही ! जन्माला आल्या पासून ते शाळेत जायला लागे पर्यंत आपण तसे सर्व दृष्टीने तसे परावलंबीच असतो. शाळेत जरा इतर मुलां मध्ये मिसळल्यावर आपल्याला थोडीशी मतांची शिंगे फुटायला लागतात . मैत्री भांडण राग लोभ अशी भावनांची आंदोलने याच वयात सुरु होतात ती अगदी कॉलेज मध्ये जाई पर्यंत पुरतात. साधारणतः शाळेत असताना आपले आयडॉल्स क्रिकेटपटू सैनिक , लेखक होते. चार्ली चाप्लीन , लॉरेल हार्डी , मिकी माउस , आपल्या आवडी होत्या .

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/02/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/20678 ८ फेब. १२ ला कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही घरी नव्हतो. आल्यावर हे सर्व दिसले जाणवले.वैतागून गेलो. पण पिल्लांना नि पिल्लांच्या आईला बाहेर कसे काढणार . .? मनात थोडा थोडा करुणेचा प्रकाश झिरपत होता . आम्ही विचार करून तिला अंगणातच राहू देणे मंजूर केले .मग तिला रोज काहीना काही खायला पण देत होतोच. ती खातपण होती. आम्ही दिसताच शेपूट हलवीत होती. तिच्या आर्जवीपणाचा राग येत होता . मग आम्ही आमच्याच मनाला गोंजारून समजावीत होतो आजकाल उष्मा वाढला होता.

मुक्तछंद

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी खूप दिवसांनी "खट्टा मीठ " सिनेमातील " थोडा है थोडे की जरुरत है " गाणे लागले होते......आधी खूप वेळा हे गाणे ऐकले होते पण आज मूड जरा वेगळा होता....जरा विचारात पडलो ...नेमकं काय सांगायचं आहे गीतकाराला या गाण्यातून... हा विचार मनात आला ....... आपल्या रोजच्या जगण्याचे जणू प्रतिबिंब यातून डोकावते आहे ........बघा ना.....

कावळे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 22/02/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
कावळे मला आवडतात . काळ्या रंगाचे दिमाखदार कावळे खरेच सुंदर शुभ्र वाटतात . पहाटे पहाटे कावळ्यांची कावकाव मला ऐकू येते नि माझी झोप उघडते. खूप छान प्रसन्न वाटते. कधीतरी कोंबड्याची बांग पण ऐकू येते . कोठे कोंबडा असतो किंवा नसतो पण कावळा मात्र सतत असतो .मनाच्या फांदीवर बसलेला असतो. कोठेही जा कोणत्याही गावी जा.कावळा दिसत नाही असे कधी होत नाही . कावळा दिसला की आपल्याला खरेच खूप बरे वाटते. कावळे दिसावयास सारखेच असतात त्यांचा आवाज एक असतो. त्यांचा रुबाब सारखाच असतो.

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/02/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे. आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.