जोरात उठते कळ....
आतल्या आत ढवळतं
आणि ज्जोरात उठते कळ
पण तिच्या मते आजकाल
मला लागलाय कवी चळ..
मग, ती समोर असली की
करतो थोडी वळवळ
आतली वेदना लपविण्यासाठी
आणतो उसनं बळ..
पण, ती ही अशी चलाख
गाठतेच माझ्या मनाचा तळ
म्हणते, बस्स झालं तुझं नाटक
नाहीतर मी काढीन इथून पळ..
माझे उर्मी दाबून ठेवण्याचे
प्रयत्न होतात निष्फळ
तिच्या ओरडण्याने भानावर येतो
पण जखम वाहत राहते भळभळ..
अरे, कविता म्हणजे नसते
प्रत्येकाच्या हातचा मळ
उगाच लिहावसं वाटलं म्हणून
सोडायचे शब्दांचे नळ..
काही कामधंदा करू नको
नुसत्याच भावना दळ
हा रोग जडलाय तुला
पण होतोय माझा छळ..
पण मी आता कोडगा होतोय
ऐकून सोडून देतो सरळ
पुन्हा आतमध्ये ढवळलं की
शब्दांचीच
मिसळपाव
२६ जानेवारी १९८७!
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.
***