Skip to main content

जीवनमान

कालाय तस्मै नम: !

लेखक गोगट्यांचा समीर यांनी शुक्रवार, 29/03/2013 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार . मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली . ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं . शहरातले लोक सुजाण , सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली वागणूक मिळत असे.

अंड्याचे फंडे ३ - छंद

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.." ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली. डोळ्य़ांच्या खाचा अन पोटाचे खळगे, आयुष्यातील खाचखळग्यांचे चेहर्‍यावर उमटलेले प्रतिबिंब, खुरटलेली दाढी अन डोक्यावरची उरलीसुरली चांदी, हसले की गंजलेल्या करवतीसारखी दिसणारी दंतपंक्ती, असा आमचा टिपिकल लोअर मिडलक्लास म्हातारा दगडूशेट.

तो हसत होता

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 27/03/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो. आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते.

राजेश सातमकर

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/03/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर. १९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही.

जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२

लेखक साऊ यांनी रविवार, 24/03/2013 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच. तर पुढे तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा.

भीषण……!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/03/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे.

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 20/03/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.” ― Chris Hedges तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते.

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस