Skip to main content

इतिहास

आज जगन्नाथाची रथयात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 13/07/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नंदीघसा तोरा अटकी गला बडसंखठारे किए से भकत एते आपणर डाकिला चंदनपुरे... काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास? ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता. जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम! (इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)

आणिबाणी

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा उद्देश स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी माहिती देणे हा आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यांपासून बचाव करण्याची गरज यांवर चर्चा करण्याचा आहे. १९७१ च्या मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत "गरीबी हटाओ" या घोषणेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. निवडणुकीनंतर थोड्याच काळात पूर्व पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबरात पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन बांगला देशाची मुक्तता होऊन हा प्रश्न निकालात निघाला. युद्धातल्या यशामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली.

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/07/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला. सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो.

स्वातंत्र्यवीर सावरकरः ऐतिहासिक उडीची शताब्दी

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 08/07/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मार्सेलिस बंदरामध्ये ७ जुलै १९१० ह्या रात्री मोरया बोट थांबली आणि ८ जुलै १९१० रोजी सकाळी स्वातंत्रवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोल मधून भर समुद्रात उडी मारली व पोहत मार्सेलिस बंदराला लागले. ह्या जगभर गाजलेल्या ऐतिहासिक पराक्रमाची आज शताब्दी आहे. त्यानिमित्त ह्या थोर स्वातंत्रवीराला मिपापरिवारातर्फे विनम्र आदरांजली.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.