Skip to main content

इतिहास

चोरी झालेले दुसर्‍या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश

शनिवार, 04/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पांढर्‍या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालयातून चोरीला गेलेले होते. या शिल्पात 8 व्यक्ती कोरलेल्या असून या व्यक्ती प्रत्येक ओळीत 4, याप्रमाणे दोन ओळीत उभ्या असलेल्या , कोरलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या शरीराचा भाग तुटून गेला आहे तर बाकीच्या व्यक्तींची नाके बहुतांशी विद्रूप केलेली आहेत. सर्व व्यक्ती डावीकडे बघताना दाखवल्या आहेत.

निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला

लेखक पियुशा
गुरुवार, 02/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :- १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे.

सफर / ओळख अहमदनगरची..

लेखक पियुशा
सोमवार, 30/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सफर / ओळख अहमदनगरची.. नमस्कार मी. पा. करांनो , मी पियू , आज अन पुढे येणाऱ्या भागांत मी तुम्हाला अहमदनगरची ओळख / सफर घडवून आणणार आहे. अहमदनगर शहराचा इतिहास ,इथल्या पौराणिक वास्तू, संग्रहालये , महाल , तीर्थस्थाने अजूनही इतर बर्याच गोष्टीशी आपण सर्वाना परिचित करून देण्याचा मानस आहे ,तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवून पहिला भाग टाकत आहे . ई . स . वी सन १४९४ मध्ये मुघल बादशाह अहमदशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली . ( याचा इतिहास मी पुढच्या धाग्यात सविस्तर देणार आहे ) ह्या २६ जाने.

आय. एन.एस कुकरी

मंगळवार, 17/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे.. बरोबर याच दिवशी १९७१ साली...... समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या.

पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये

गुरुवार, 12/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा. चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय. चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो.

‘निया’ मधल्या लाकडी पाट्या

बुधवार, 11/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.

नृपशंभू- छत्रपती संभाजी !

मंगळवार, 10/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' , त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल... त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही. ८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्य