Skip to main content

धोरण

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

दुखरी बाजू का खुपते?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/11/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख जरूर वाचावा http://tinyurl.com/lokanna लोकसत्तेने उगाचच नि:पक्षपणाचा आव आणून अण्णांच्या आंदोलनावर टीका सुरु केली होती जणू ए राजा, कनिमोळी, कलमाडी आणि टीम मनिमोहनचे सदस्य धुतल्या तांदळासारखे आहेत.

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

नव्या संपादकांचे अभिनंदन

लेखक क्रेमर यांनी बुधवार, 05/10/2011 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही

लेखक शाहिर यांनी गुरुवार, 22/09/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो. पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्‍या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.

माझ्या वाचक मित्रांनो....................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे. हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल. पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर) अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून. हाईन्झ गुडेरिअन मुसोलिनी. मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे. अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-) आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा, जयंत कुलकर्णी.

निस्तीच पोकापोकी!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 16/09/2011 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

एक स्वतःची भाषा

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 15/09/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर वावरताना आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे. काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया उदा... मोठे व्हा जिलब्यापाडू लिखाण हलवाई भंपक आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी ---