"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते.