सवाल-जवाब..मी आणि "II राजे II"
मंडळी,
आपले लाडके मिपाकर "II राजे II" यांनी मला खरडीतुन एक कविता पाठवली.
तुमचा बार आहे काय
जर नसेल बार
तर कसे करता तुम्ही
कॉकटेल तयार?
जळवता आम्हाला फार
कळतात नाटक्या तुमची
थेरं अपरंपार !
व्हिस्की नसेल तर
ज्युस देता करुन तयार
तुमच्या लेखामध्ये
जिव जडला निरंतर यार !
आता एव्हढे आम्हाला हरभर्याच्या झाडावर चढवल्यावर (आम्हाला चढल्यावर नव्हे!!) आम्ही कसले मागे हटतो.
मिसळपाव
" alt="" />
"अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे' हा वाक्प्रचार जसा अंतू बर्व्यानं मराठी भाषेला बहाल केला, तसा "कोणतीही गोष्ट उठसूट विसरणे म्हणजे एखाद्याचा "गजनी' होणे' हा वाक्प्रचार ए. मुरुगदासने बहाल केलेला म्हणायला हवा. तर, माझा सध्या असा "गजनी' झालाय.
एखादी प्रचंड इंटरेस्टची गोष्ट वगळता, बहुतेक सगळं विसरायला होतं. मध्यंतरी "अल्झायमर'चा पण एकदा भास झाला होता.