Skip to main content

विरंगुळा

दिवे आगर

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 19/07/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो. "अरे अचानक कुठे जाताय? रहायला जागा मिळणार नाही, सगळीकडे बुकींग फुल असतं" असं म्हणुन २-३ जणांनी टांग दिली तरी आम्ही तीन जण निघालोच.

कर्नाळा....एक आठवण....

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 17/07/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही भटकंती जरा जुनी आहे पण जास्त आठवणीत राहीलेली.... सकाळीच पाण्याची बाटली आणि केकचा पुडा घेऊन वाशी-अलिबाग एस-टी धरली आणि कर्नाळ्याचा पायथा गाठला.गणेशचतुर्थीचा दिवस आणि त्यातही मिड-वीक असल्यामुळे कोणीही नव्हते. कधीही पाऊस पडेल असे अन्धारून आले होते. कर्नाळ्याचा पायथा आणि एकंदर परीसरच गच्च झाडीने झाकलेला आहे. हे जंगल नवख्या माणसाला दचकवेल असे भयाकारी नक्कीच आहे. पण तसे घाबरण्याचे काही कारण नाही. इथे वन्य प्राणि मला तरी कधी दिसले नाहीत. कर्नाळा पक्शी अभयारण्य आहे. या वेळी माझ्याकडे माझा जुना Canon A400 होता. १-२ भट्क्यांपलीकडे दिवसभरात कोणीही दिसले नाही.

निगरगट्ट आठवांचा चिखल..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 17/07/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच... अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात. जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी...

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

राजयोग

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 15/07/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या.

कोरीगड

लेखक येडाखुळा यांनी बुधवार, 14/07/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडा का होइना, पाऊस झाल्यामुळे आम्ही कोरीगड किंवा कोराईगड येथे नुकतेच जाऊन आलो. तिथली काही छायाचित्रे येथे डकवत आहे. लोणावळ्याच्या पुढे अ‍ॅंबी व्हॅलीला जो रस्ता जातो त्या रस्त्याने जात राहिले की पेठ शहापूर हे गाव लागते. तेच पायथ्याचे गाव आहे.गड चढायला अगदीच किरकोळ आहे.

तारकर्ली - कोकण

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/07/2010 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
तारकर्लीचा स्वच्छ पांढर्‍या रेतीचा समुद्रकिनारा तारकर्लीचे एमटीडीसी रेसोर्ट