Skip to main content

विरंगुळा

खेळ मांडियेला...

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
"काय करायचं, बोला लवकर." (फलित गिळोत चिंतातूर दिसत होते.) "कशाबद्दल?" (कृष्णेश आजताडी शिल्पा आणि करीनाचे फोटो न्याहाळत उद्गारले. त्यांच्या चेहर्‍यावर अगदी करूण भाव आले होते. या मुलींना आपल्या महान देशात अंगभर कपडे देखील घालायला मिळत नाहीत याची खंत त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. आणि असले फाटके कपडे घालून यांना जनतेला सामोरे जावे लागते याचेही त्यांना अतीव दु:ख होत असल्याचे दिसत होते.) फलित गिळोत (फगि): अहो, इतकं सगळं सांगीतलं नं मी...त्याच्याबद्दल... कृष्णेश आजताडी (कृआ): अरे हो...त्याच्याबद्दल ना...काही काळजी करू नका.

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.

नीळा पक्षी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत पण अजूनही नीळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी नीळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपीत नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं.

इद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 23/09/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
ईद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश (९०% जास्त) असून या देशाचा सगळ्यात मोठासण आहे ‘लबारान’. लबारान हे ईद-उल-फित्री या सणाचे इंडोनेशियन नाव आहे. या सणाला भारतात रमझान ईद म्हणतात तर अरबी रूप आहे इद्-उल-फित्र. अरब भाषेत Eid म्हणजे आनंदोत्सव, सण साजरा करणे आणि फित्र या शब्दाचा अर्थ आहे उपवासाच्या महिन्याची सांगता. थोडक्यात महिनाभर उपास करून स्वतःला पवित्र केल्यानंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे लबारान. हा सण रमझान महिन्यातील उपवासानंतर येणार्‍या शावालच्या पहिल्या दिवशी (प्रतिपदेला) येतो. (इंडोनेशियात रमझानला रामादान म्हणतात)

पुढल्या वर्षी लौक्कर या...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/09/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला.. लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी.. सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:) गंपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौक्कर या!

जीवन एक महामार्ग

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 22/09/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा संभव असतो. अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही. कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्‍या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन् वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो. वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते.

भेट तूझि अन मझि,,,,,

लेखक ज्ञानराम यांनी मंगळवार, 21/09/2010 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तूझि अन मझि,,,,,स्मरते का रे तुला??? का तुही विणलास सन्सार माझ्या अबोल फुला तूच शपथा दिल्या, अन स्वप्नेही तूझिच होति, पण कालच्या स्वपनालि कळी नविन होति. पाहता तूला रे दारी ..लालि फुलून आलि, पण तूझ्या दोळ्यात तेव्हा मि रे अनोळखि होति... का वागलास असा..?? एकटा सोडूनि गेलास... मि वाट पाहत बसले... वचने तोडूनि गेलास... मज वाटायाचे रोज,,, तू येशिल मागे परतुनि वचने दोघान्चि होति.. अर्ध्यावर... गेलास...मोडूनि मी आज हि पाह्ते तू़जला.. माझ्याच दोल्यान्त ....ये लवकर ये रे अता.... आज... होईल देहाचा अन्त...........

खराब रस्त्यांचे फायदे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
खराब रस्त्यांचे फायदे
भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे.

शोध्

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 20/09/2010 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
me onjalit majhya tujhech pratibimb pahate Ankhand tujhya kurpechya sagarat nahate Tu bhetshil kevha?? tujhi vat pahate, Antaratle kavya anatarich re rahate.....