गोष्ट-२ लिंगबदल
लिंगबदल
भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते".
भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले.
मिसळपाव
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.