चित्ताकर्षक गोष्टी -१
दर्शनांवरील लेखमालेने डोके गरगरत असणारच; त्यावर उतारा म्हणून दोन तीन सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे सुरवात माधवीपासून.
गालव हा विश्वामित्रांचा शिष्य.अनेक वर्षे गुरूची सेवा केल्यानंतर त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ? ही अट कशी पुरी करावयाची ?
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप!
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.