Skip to main content

विचार

कथा एका कट्ट्याची

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 06/09/2017 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत.

बरं एवढं नि उगीच थोडं ..

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 06/09/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय. ‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात ! ‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’ बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !! आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी.

आवाज

लेखक तिमा यांनी रविवार, 03/09/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्‍या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्‍या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे.

‘गुलजार’ मनाचा वेध

लेखक पी महेश००७ यांनी शुक्रवार, 01/09/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला गुलजार यांच्या कविता, गझला ऐकल्या नाही तर तो दिवस ‘गुलजार’ वाटतच नाही. उगाचच त्यांच्या गझलेतला अर्थ शोधत असतो. गझलेतला अर्थ शोधू नका, नाही तर अडचण होईल, असं प्रसिद्ध शायर राहत इंदुरी म्हणतात. पण गुलजार यांच्या ‘मैं वहीं हूँ’मध्ये मी काही तरी शोधत होतो. त्यातलाच हा छोटासा प्रयत्न... पी. महेश पहाटेची अंधारलेली वाट. मधूनच कोंबडा आरवतो, तर दूर कुठे तरी गाय हंबरते. कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतात. गुलाबी थंडीचे ते दिवस. धुके मात्र अजूनही दाटलेले असते. गावातलं हे झुंजुमुंजू वातावरण कधी तरी अनुभवलेलं असतं. हे मी अनुभवलंय अगदी ८०-९० च्या दशकात.

आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर झोपला !

लेखक १००मित्र यांनी मंगळवार, 29/08/2017 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो. क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच मुळी त्याचं लवकर न संपणे हे आहे. बघा ना, सर्वात लवकर संपणारा सामना देखील (टी २०) ४ तास चालतो. ह्याउलट इतर खेळ ४५ मिनिटे- १.५ तास , दोन तास असे चालतात. सांघिक बरं का.

स्वातंत्र्य लढा २.०

लेखक उमेश धर्मट्टी यांनी मंगळवार, 29/08/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या. ७० वर्षाचा झाला आपला देश आणि आता पंचाहत्तारीकडे वाटचाल. एका मनुष्याच्या आयुष्यात हा एक आयुष्याचा उतरणीचा काळ असतो, पण देशासाठी तेही आपल्या देशात जेथे तरुणाची संख्या प्रचंड आहे, तो देश म्हातारा न होता तारुण्याने सळसळत असतो. इथून पुढचा काळ आहे आपला आहे, जगात आपण आपला ठसा उमटवू शकतो आणि महासत्ता होऊ शकतो.

'अक्षर मैफल'ची भूमिका

लेखक रणभोर यांनी मंगळवार, 29/08/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी रात्री कोणत्या तरी मित्राच्या घरी किंवा रूमवर सगळे जमतात. आपल्याला आवडतं ते खायला प्यायला घेऊन येतात. आणि गप्पा मारत बसतात. हा अनुभव बहुतेक सर्वांना असेल. अशा मैफलींना वयाचं बंधन नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मैफलींना विषयाचं बंधन नसतं. मला तर असा अनुभव आहे कि एरवी उघडपणे बोलता येणार नाहीत असे सर्व गंभीर विषय सुद्धा तिथे सहज मोकळे होतात. रात्रभर गप्पा सुरु राहतात. मित्र दर्दी असतील तर कदाचित मागे बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अली (आपापल्या आवडीनुसार) सुरु असतो. एका प्रसन्न वातावरणात, हसत खेळत यच्चयावत विषय बोलले जातात. आम्ही सुरु करतोय अशीच एक मैफल.

सरकारी नियमन आणि बाहुबली

लेखक साहना यांनी मंगळवार, 29/08/2017 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही निर्याणाचे प्रथम अनुक्रम परिणाम (फर्स्ट ऑर्डर कॉन्सिक्वेन्सेस) बहुतेक लोक ओळखू शकतात पण द्वितीय आणि तृतिय अनुक्रम परिणाम मात्र अनुभवी आणि जाणकार लोकच ओळखू शकतात. खुप वेळा बैल पळून गेल्यानंतर सुद्धा नक्की कारण बहुतेक लोकांना समजत नाही. खूप वर्षां आधी देशांत चित्रपट (गृह) हे सर्वांत लोकप्रिय मनोरंजनाचे साधन होते. लक्षावधी लोक चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहत. सरकारने ह्या मतपेढीला ओळखले आणि मते मिळवण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटावर किंमत निर्धारीत करायचे ठरवले. बहुतेक लोकांनी आनंदाने सरकारी निर्णयाचे स्वागत केले.

अँड्रॉपॉज.... एक दुर्लक्षित विषय!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 28/08/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉज बद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही.   पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात. अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते.

मी आणि लालबागच्या राजाचे दर्शन

लेखक कुटस्थ यांनी सोमवार, 28/08/2017 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावर्षीसाठी. टीव्ही वरूनच घेतलं. परंतु टीव्ही वरून जेंव्हा त्याचं लोभस आणि गोजिरं रूप पाहिलं तेंव्हा मात्र नकळत का होईना मनातून नमस्कार केला. मुद्दामचं प्रत्यक्ष नाही गेलो. शेवटी गणपती हे परब्रह्माचच रूप. ते सर्वंकडे आहेच. अगदी आपल्याला सर्वात जवळ अश्या आपल्या शरीरात आणि मनातदेखील. अगदीच मनाचं समाधान होण्यासाठी शरीराने देवाचं दर्शन घ्यावे असं वाटलं मग कोणत्याही सध्या गणपतीच्या मंदिरात जिथे खरी मानसिक आणि आत्मिक शांतता लाभेल तिकडे जावे कि अत्यंत गर्दीमध्ये धक्काबुक्कीत राजाकडे जावे असा प्रश्न जेंव्हा मनात येतो तेंव्हा मन साहजिकच पहिल्या पर्यायाकडं झुकतं.