Skip to main content

विचार

हॅरी पॉटर

nishapari यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हॅरी पॉटर ज्यांना मुळात वाचन या प्रकाराचीच ऍलर्जी आहे अशांचा काही प्रश्नच नाही . पण अनेक वाचनप्रेमी मराठी लोक हॅरी पॉटर म्हणजे लहान मुलांची पुस्तकं किंवा काय ती जादू आणि छड्या बिड्या .. हे काय वय आहे का परीकथा वाचायचं .... लहान होतो तेव्हा वाचलं कि अल्लादिन आणि जादूचा दिवा वगैरे ... आता त्यात इंटरेस्ट वाटणं शक्य नाही असं म्हणतात आणि हॅरी पॉटरच्या वाटेलाच जात नाहीत . तर काहीजण हॅरी पॉटरचे चित्रपट पाहतात (क्वचित कुतूहल म्हणून किंवा बहुधा मुलांच्या आग्रहाखातर ) आणि त्यांचा त्यातला रस संपतो . " माहीत आहे स्टोरीलाईन मला ; एवढी काही खास नाही !

विकासाचे पर्यायी मॉडेल

संदीप ताम्हनकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतातल्या पर्यावरणवादी आणि प्रकल्प विस्थापितांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे चळवळ आणि आंदोलने चालवणाऱ्या आदरणीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यांनी पोटतिडकीने विषयाची मांडणी केली. भाषण नक्कीच प्रेरणादायी होतं. भाषणात अनेक विषयांवर त्या बोलल्या.

कागदाचे झाड

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास यांनी या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मला भेटलेले रुग्ण - १०

डॉ श्रीहास यांनी या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

सांगायला हवं

आशु जोग यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा उद्धव काळ खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात पण मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते. बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्‍यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते. नीट लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले ते काँग्रेसच्या विरोधात. शिवसेना स्थापन झाली काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी.

फुलांची फुल स्टोरी...

हेमंत ववले यांनी या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीमध्ये धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो. लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो.

लेखकाची थेट भेट !

हेमंतकुमार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात. साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत.

काय विचार करताय?

शब्दबम्बाळ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच बोली आणि भाषा या लेखावर गापै यांची प्रतिक्रिया वाचून डोक्यात काही विचारचक्रे फिरू लागली. त्यात एक मुद्दा असा आला कि भाषा हि एका व्यक्तीसाठी किती गरजेची आहे? आपण लहानपणापासून काही भाषा शिकतो आणि हळूहळू त्याच भाषेत "विचारही" करू लागतो. विचार करताना आपल्याला कोणाशीही चर्चा करायची नसते किंवा कोणाला मुद्दा समजून सांगायचं नसतो तरीही आपण आपल्याला शिकवलेल्या भाषेतच विचार करतो.

बळी [शतशब्दकथा]

निओ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.