मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

लिफ्ट करा दे

सरनौबत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लिफ्ट करा दे दिवसभर ऑफीसमध्ये एकामागोमाग एक मिटींग्समुळे पुरती दमणूक झालेली. संध्याकाळी उशीरा एकदाची कामं संपली. आता घरी जाऊन मस्तपैकी अंघोळ करायची आणि मग टीव्हीवर 'चला हवा येऊ द्या' बघत जेवायचं ह्या विचारात घराजवळ कधी पोचलो समजलंच नाही. तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे.

Ugly- सगळे प्रश्न सोडवूनहि अनेक प्रश्न विचारणारा चित्रपट!

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिरीष कणेकर फिल्लमबाजी मध्ये एक गोष्ट सांगायचे. “नाटकाचा/ चित्रपटाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात किंवा सुरुवातीला भिंतीवर बंदूक दाखवली तर नाटक/ चित्रपट संपेपर्यंत तिचा बार उडालाच पाहिजे...” म्हणजे थोडक्यात काय तर नाटक, चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रत्येक दृष्याची, धाग्याची कथेशी संगती अखेर पर्यंत तरी जुळलीच पाहिजे. सगळी कोडी सुटली पाहिजेत. असा हा अलिखित नियम. तो न पाळणारे ते ढिसाळ, निष्काळजी दिग्दर्शक किंवा लेखक... आता मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो.

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा! मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत.

विष्णू - बोधचिन्हे आणि प्रतिकं

आर्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते, पण कामामुळं राहून जात होतं... थोडी रोचक माहिती............ काही दिवसांपूर्वी पुन्हा दक्षिण भारत फिरायचा योग आला, त्यामध्ये अनेक मंदिरात गेलो, अर्थातच सर्वात जास्त मंदिरं विष्णूची किंवा त्याच्या विविध अवतारांची होती उदा: राम, कृष्ण, नृसिंह, केशव इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी वेगळी मुर्ती, वेगळी रचना, नाव वेगळं त्याचे सहचारीही वेगळे होते. एव्हढाच काय आपण विष्णूच्या विविध मूर्ती, चित्रं आणि ग्राफिक बघतो त्यात प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विष्णूची रूपं दाखवतो, म्हणून त्यावर अभ्यास करायचा ठरवलं आणि त्यातून काही रोचक माहिती समोर आली.

चॅलेंज - भाग ५ अन्तिम

aanandinee ·
लेखनविषय:
चॅलेंज भाग ५ (अंतिम) एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला” “तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला. “बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं. “नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता.

चॅलेंज - भाग ४

aanandinee ·
चॅलेंज भाग ४ “आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं. “अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?” “जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं. “अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही.

अतींद्रिय अनुभव : डॉक्टरांची तडजोड आणि भ्रूणहत्या

सत्या सुर्वे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉक्टर सदाभाऊ मराठवाड्याच्या एका दुर्गम म्हणाव्या अश्या भागांत दाखल झाले आणि काही दिवसांनी मी सुद्धा दाखल झालो. सदाभाऊ हे घोरपडे घरातील द्वितीय मुलगे. प्रचंड श्रीमंती घरी वास करत असली तरी सदाभाऊ ना त्यांची काहीही पर्वा नव्हती. ते आधी डॉक्टरकी शिकायला गेले, तिथे एक मुलीच्या प्रेमात पडले आणि वडिलांच्या विरुद्ध जाऊन घरजावई म्हणून ह्या गावांत दाखल झाले. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहून एखादा चांगला कारकून पाठवण्याची विनंती केली होती. घोरपडे घराण्यात मी कामाला होतो पण दुय्यम दर्जाचा दिवाणजी म्हणूनच. मला दुर्गम भागांत इच्छा जरी नसली तरी पूर्णपणे सारा कारभार माझ्याच हातांत राहील म्हणून मी हि नोकरी पत्करली.

एक आठवण

अनिवासि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या. ८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे. युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली.

खरेदी एक भोग!

sudhirvdeshmukh ·
लेखनविषय:
खरेदी एक भोग ! जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.

ऐसी भी क्या जल्दी है !

sudhirvdeshmukh ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात.