Skip to main content

विचार

आई कसे म्हणु मी...

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आई कसे म्हणु मी Mummy येई मुखी English याच्या जगात मराठी मन माञ दु:खी बाबांचे झाले Daddy ताईची झाली Sister English च्या जगात नवरे झालेत Mister जग झाले सारे Fast-food जे चांगले ते झाले Good मिञ सर्व झालेत Friend शनिवार झाला Weekend राञ झाली आता Night मारामारी म्हणजे Fight जे बरोबर असेल ते Right आज पैशाचे झाले दोन प्रकार एक Black तर दुसरा White English च्या या जगाचे काहीच खरे नाही कालपर्यंत होते जे उद्या काहीच दिसणार नाही जुन्या सर्व गोष्टींचा नव्यापीढीसाठी झाला इतिहास इंग्रजी शिकावी प्रत्येकानं हाच आधुनिकीकरणाच्या ध्यास
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनग
Taxonomy upgrade extras

आसाराम बापु

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
Taxonomy upgrade extras

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

खेळ खुर्चिचा

लेखक मनोज यांनी शनिवार, 06/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ जुना खुर्चिचा हा पुन्हा नव्याने चालला जे गेले बळी त्यांचा खेद कुणा वाटला? कोण आले? कोण गेले? मारीले कुणी ? कोण मेले? सत्तेचे भुकेले बघ पुन्हा प्रवासा निघाले आतंकाचे कुंड जळते अन मुक्यांच्या आहूती कोणी रक्षावे कुणाला? षंढ सारे भोवती विध्वंसाचे पर्व मोठे आघात त्यांचे विषारी हात व्यस्थ रक्षकांचे खुर्चीचे सारे पुजारी हे नित्याचेचा आता सवय याची लाउन घे मेले त्यात तु नव्हता धन्यता मानुन घे
Taxonomy upgrade extras

सुमारांच्या तावडीत...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 05/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

लेखक कोलबेर यांनी शुक्रवार, 05/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे. गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही.

अनुत्त्तरीत प्रश्न

लेखक जयेश माधव यांनी शुक्रवार, 05/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ताज ओबेराय वर जो अतीरेकी हल्ला झाला,त्यात पोलीस तसेच आर्मीचे जवान शहीद झाले,त्या शहीद झालेल्या सर्व जवाना॑ना मानाचा मुजरा! पण पुढे झालेले राजकारण बघुन काही प्रश्न अनुत्तरीत रहातात ते असे---- १..पोलिस आणि आर्मीचे जे जवान शहिद झाले त्या शहीदा॑वर राजकारणी लोका॑नी लाखो॑ करोडो रुपये ओवाळुन टाकले पण...पण..रोज बोर्डरवर मरणार्या शहीद जवाना॑साठी कोण काय देतो? २..ताज ओबेराय या प॑चतारा॑कीत होटेला॑वर हल्ला झाला म्हणुन गळा काढुन रडणारे सीने तारे आणि तारका मुलु॑ड,घाट्कोपर तसेच अन्य ठिकाणी झालेल्या बोम्ब हल्ल्यात कीतीतरी सामान्य माणूस मेले तेव्हा कुठे होते? जयेश अ.माधव

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

कोण कोम???

लेखक सुनील मोहन यांनी बुधवार, 03/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.