Skip to main content

विचार

सोशल नेटवर्किंगची कमाल!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/02/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २००६ ते जून २००९ या जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावद्यीत ट्युनिशियामधील अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिंग्टनला काही गुप्त संदेश पुरवले. असंख्य गुपिते फोडून जगभरातील सत्ताद्यीशांना घाम फोडणा-या आणि अनेक मुखवट्यांआडचे खरे चेहरे जगासमोर आणणार्‍या विकीलिक्सच्या हाती या संदेशांच्या दहा फाईल्स सापडल्या, आणि गेल्या नोव्हेंबरच्या आसपास ट्यूनिशियातील अराजकाच्या परिस्थितीची भयानक जाणीव तेथील जनतेला झाली.

इजिप्त आणि असहकार

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 11/02/2011 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे. मुबारक यांनी उपाध्यक्षांकडे सत्ता सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदर घटनाक्रमात इजिप्तच्या लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरली. निदर्शने करणार्‍या लोकांवर शस्त्र चालवण्यास सैन्याने नकार दिला. त्यामुळे मुबारक यांना पर्यायच उरला नाही. या निमित्ताने (अहिंसक) असहकाराच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिकच तेथे दिसून आले. एखादे जुलमी सरकार अन्यायाने देशाच्या जनतेवर राज्य करते.

वेले

लेखक विकि यांनी शुक्रवार, 11/02/2011 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्प्प्प

कामापुरता नर

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.

प्रवास...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 10/02/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दमलोय आता.. खूप लांबपर्यंत आल्याची जाणीव होतेय... माहिती आहे कि अजून काहीच प्रवास झलेला नाही... पण ह्या क्षणी खूप दमलोय. स्वतःला झोकून दिलेलं होतं ह्या गर्दीच्या प्रवाहात, कधी मी चाललो तर कधी ह्या गर्दीने मला चालवलं. आता थांबावसं वाटतंय. लांबपर्यंत कधी आलो कळलंच नाही मला. काल हातातून रेती सुटते तसा सुटत गेला आयुष्यातून. जबाबदारीचे ओझे खांद्यावर वागून दमलोय आता. हे ओझ खरच मला उचलायचा होतं का मीच ते उचललं हे सुद्धा समजत नाही.