Skip to main content

विचार

जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य कि निव्वळ फसवेगिरी..???

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 29/12/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!! .... खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..? की निव्वळ फसवेगिरी आहे..??? चला पाहू..! पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत..

आंदोलन आणि फलित

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 28/12/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली. आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.

एक कविता आठवतांना...My Sorrow

लेखक मनिष यांनी रविवार, 25/12/2011 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
यशवंतच्या कविता वाचल्यावर माझ्या काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे, पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. १९९७ ला लिहलेली. ती मनस्थिती आजही व्यवस्थित आठवतेय. विशीतच होतो आणि ज्या वयात 'लाथ मारेल तिथे पाणी काढेल' असा आत्मविश्वास असतो तेंव्हाच आलेल्या असंख्य अडचणींमुळे आणि अपयशामुळे खूच खचलो होतो आणि नाउम्मेदही झालो होतो. मित्रही पांगले होते...खूपच एकटा, एकटा झालो होतो. आणि कुठेतरी आत खोलवर डिचवलोही गेलो होतो, आणि त्यातूनच एक जिद्द थोडीशी उगवत होती.

अश्रू

लेखक मयुरपिंपळे यांनी शुक्रवार, 23/12/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

लोकपाल आणि भ्रष्टाचार...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 20/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : सगळ्यात पहीलं म्हणजे "चावून चोथा" अश्या विषयावर लिहून मिपाची जागा खातोय, ह्यासाठी "सॉरी शक्तिमान !".. लेखाचा उद्देश्य फक्त लोकपालबद्दल चर्चा करण्याचा आहे. ************************************************************** हां, तर आजकाल लोकपाल वर बरीच चर्चा सुरु आहे. टिव्ही, सरकार, माध्यमं सगळीकडे हेच.. "लोकपाल आणि लोकायुक्त" ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सगळ्यात आधी १९६८ मध्ये देण्यात आला. १९६९ मध्ये इंदिरा सरकारने संसदेत पहिल्यांदा हे बिल मांडले, पण पारीत झाले नाही. त्यानंतर आतापर्यंत जवळपास आठ-दहा वेळा हे बिल संसदेत आले, पण त्याचा कायदा झालेला नाही..