Skip to main content

विचार

"निषेधकर्ता" च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 15/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम मॅगझीन या साप्ताहीकाच्या दर वर्षाअखेरीस प्रसिद्ध केल्या जाणार्‍या "वर्षातली व्यक्ती" अर्थात "Person of the Year" ला खूप प्रसिद्धी मिळते. १९२७ सालापासून सुरू केलेल्या प्रथेमध्ये केवळ अमेरीकन व्यक्तीच, किंबहूना केवळ व्यक्तीच असते अशातला भाग नाही. १९८२ साली Machine of the year म्हणून संगणकाचे छायाचित्र आले (थँक्स टू अ‍ॅपल) तर १९८८ साली Planet of the year असे म्हणत प्रदुषणाने विनाशाकडे वाटचाल होऊ शकते या विचारांचे समर्थन करत "पृथ्वी"स पुढे केले होते.

कोड ऑफ कंडक्ट

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही"? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो. "काय झाले सक्काळी सक्काळी", आमचे अर्धांगं. "अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.", मी. "मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.", उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले. त्या आवाजाच्या "उंची" वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी मांडवली करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले.

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

आजोबांच पेन

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

आई, असं का ग केलंस?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले. एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते. ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्‍यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे. काहीही अपराध नसताना केवळ स्त्री आहे म्हणून जन्माअगोदरच हत्या होते आणि हजारो निष्पाप कळ्या उमलण्या अगोदरच खुडल्या जातात. हा आपल्या समाजाला काळीमा आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर ...

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 02/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती.

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.