Skip to main content

विचार

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 02/10/2012 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light.

फेसाळबुक

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 27/09/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?" "आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो." "तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता.

सैतानाचे वरदान

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 24/09/2012 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध, थयथयाट आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ? आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल - कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे.

मैत्री ...

लेखक विदेश यांनी रविवार, 23/09/2012 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री ... मैत्री म्हणजे घाई गडबड नाही मैत्री म्हणजे काही धडपड नाही मैत्री म्हणजे उदार उसनवारी नाही मैत्री म्हणजे दारोदारी नाही मैत्री म्हणजे दारात नाही मैत्री म्हणजे बाजारात नाही मैत्री म्हणजे देवघेव नाही मैत्री म्हणजे देवदेव नाही मैत्री म्हणजे आकाश नाही मैत्री म्हणजे पाताळ नाही मैत्री म्हणजे वरवर नाही मैत्री म्हणजे घरघर नाही मैत्री म्हणजे तिरकसपणा नाही मैत्री म्हणजे भंकसपणा नाही.... मैत्री म्हणजे आहे तरी काय ? मैत्री अनुभवायचीच चीज हाय ! .

प्राणप्रतिष्ठा

लेखक अर्निका यांनी बुधवार, 19/09/2012 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
“आबा, अत्ता गणपतीच्या जवळ का जायचं नाही?” “अत्ताच त्याला आणलंय ना घरी, जरा बसू दे त्याला!” “मग उद्या सकाळी उठल्या उठल्या जायचं ना गं आजी?” “अंघोळ करून मग ! गुरुजी येतील, ते पूजा करतील आणि मग आपण जायचं.” “पण गुरुजी आपल्या आधी त्याच्याजवळ का जाणार आहेत?” “अगं, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला म्हणून.” “प्राणप्रतिष्ठा म्हणजे?” हे कुतुहल ओठांशी यायच्या आतच आम्ही झोपायचो. उद्याची वाट बघत. त्या दिवशीची झोप अर्धवट असायची आणि झोपेत पडलेली स्वप्नही! बाहेरच्या खोलीतले दिवे अजूनही मालवलेले नाहीत, दबलेल्या आवाजात तिथून हसण्याचे, गप्पांचे आवाज कानावर येत आहेत.

खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी.

<रडारड>

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 13/09/2012 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.