Skip to main content

विचार

पुराना मंदीर और पुरानी यादे ( बालपणीच्या आठवणी )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी सोमवार, 05/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे. जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले. भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला. आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली.

मुली आणि आम्ही

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 02/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे.

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

लेखक ह भ प यांनी गुरुवार, 01/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनाच्या कोणत्याही पुर्वानुभवाशिवाय लिहितोय. पण लग्न ठरत असलेल्या एका तरुणाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतोय. (फार पुर्वी आतंरजालावर एके ठिकाणी प्रकाशित केला होता..)या लेखामध्ये प्रकट केलेल्या घटना व विचारांशी लेखक सहमत असेलच असे नाही.. शिवाय संपुर्ण काल्पनिक.. अन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित बहुदा..

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

साधारण २७ व्या वर्षी करायचं ठरवलं होतं.. दीड वर्षं अगोदर होतंय.. पण मुली बघायला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी एप्रील मध्येच.. मी घरापासून लांब राहतो.. चांगलाच लांब.. रेलवेनं घरी यायचं म्हटलं तरी २४ तास लागतातच लागतात.

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

लेखक औदुंबर यांनी गुरुवार, 01/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!

मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 31/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित ! हा राजू मुळचा सिंधी ! फाळणीनंतर वडील मुंबईला स्थाईक झाले . मग राजूचा जन्म .सुमारे १९५० चा ,राजूने इलेक्ट्रीशियन चे शिक्षण घेवून मुंबईत छोट्या-मोठ्या कंपनीत जॉब केले . १९७८ ला सर्वप्रथम कतार ला आलां , लग्न झाले ,पण बायको मुंबईतच!

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 31/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला.

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

संधिप्रकाश आणि सांजवेळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 27/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते.

शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यातील भाषण

लेखक yeda यांनी शनिवार, 27/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यात CD वर झालेलं भाषण ऐकलं . http://www.dailymotion.com/video/xularp_bal-thackeray-speech-at-shivsen… मनात कित्त्येक विचार आले.