Skip to main content

विचार

आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं, जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण दुचाकीधारकांना कार रेस मधे आरक्षण सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण.... ...यादी खूप मोठी आहे.

अधीर उपाशी

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीत बढती मिळत नाही, पैशाची चणचण मिटत नाही, घरगुती वातावरण अशांत, अशी समस्यांची चेकलिस्ट घेऊन अमूकगावातला एक माणूस तमूकगावातल्या एका खूप मान्यता असलेल्या गणपतीच्या देवळात हजर झाला. त्याच्याच आयटी कंपनीत काम करणा-या एका मित्राने हे देऊळ त्याला ‘रेफर’ केलं ‘रेफर’. तर साहेब लगोलग गाडी बुक करून तमूकगावाला रवाना झाले आणि देवळात पोचले. ‘जे जे शक्य आहे ते ते करून बघू’ असं म्हणून. "देवा, फार लांबवरून तुझ्याइथे आलोय. तू सगळ्यांकडे बघत असतोसच. तुला माझीही अवस्था दिसत असेल. माझी स्वप्न कशी अर्धवट राहतायत, त्यांच्या पूर्ण होण्यात कशा आणि कुठल्या अडचणी येतायत, हे दिसत असेल. तरीही.

कर्करोग स्तनांचा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/02/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ------------------------ हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे.

चोरावर मोर!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 13/02/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
1 २६ जानेवारी १९८७! दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.

विसरलेल्या सामानाला

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/02/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलेल्या सामानाला माझ्या ब्यागेत जागा नव्हती. उण्यापुर्‍या आठवणीनी ब्याग भरलेली होती. अथांग ओझी वाहून ती थकली होती. प्रत्येक प्रवासात नव्याने थकली होती जो भार होता मूक बिचारी सोसत होती. कोंबून; कधी मुस्काट दाबून भार मुक्याने पेलत होती. कुरकुरण्यार्‍या बिजागिर्‍या, तुटके ह्यांडल. घसटलेले कव्हर.... गर्दीतही ओळखता येत होते. सॅमसोनाईटच्या चमको गर्दीत ती एकटीच बापुडवाणी होती जुनी म्हणेल कोणी तरी ना फेकून देईल माळ्यावर आधार होईल. कोणीतरी एक दिवस अंतरंग पाहील जुन्या रद्दीला उजाळा देईल. कष्टाचे दिवस आठवून या सुखाच्या दिवसांचे समाधान अनुभवेल. तसे काही झाले नाही.

Valentine Day

लेखक NiluMP यांनी रविवार, 10/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते.

एक विमान हरवलेलं...

लेखक चावटमेला यांनी रविवार, 10/02/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता.

"संवाद"

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 09/02/2013 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चक्र तेथुन उडुन 'उध्दवा'च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले ! . . . अगदी काल परावाची गोष्ट . ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ... " हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत .ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो .