Skip to main content

विचार

बालपण

लेखक Hrushikesh Marathe यांनी बुधवार, 03/06/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो. चालता चालता नजर रस्त्याबाजूच्या एका छोटयाश्या इमारतीवर गेली. ती छोटी इमारत दुसरं तिसरं काही नव्हे तर एक शाळा होती. शनिवारचा दिवस होता, अर्थात सकाळची शाळा. तो तास खेळाचा होता बहुतेक. छोटयाश्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काही मुली घोळका करून उन्हात उभ्या होत्या, काही उत्साही मुलं शाळेच्या आवाराची साफसफाई करत होते. काही जण झाडांना पाणी घालत होते. तर काही मुलं आबाधुबीच्या नावाखाली आपले हात साफ करत होती. हे सगळं पाहताना दोन क्षण सुखावलो.

डोळे उघडणे - काही विचार

लेखक पथिक यांनी बुधवार, 03/06/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका जुन्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. गप्पा चालल्या होत्या. तिच्या जॉब बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!' हा 'डोळे उघडणे' हा मोठा विलक्षण आणि दुर्मिळ प्रकार आहे! ज्याचे डोळे उघडतात त्याचे आयुष्य पार बदलून जाऊ शकते. बदल कसा आणि किती होणार ते डोळे कोणत्या बाबतीत आणि किती उघडले यावर अवलंबून असते. माझ्या या मैत्रिणीचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडले आणि तिच्या करिअर मध्ये थोडा बदल झाला.

(चा)वटपोर्णिमा

लेखक फुंटी यांनी मंगळवार, 02/06/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

शिक्षणाच्या नावानं चांगभलं !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/05/2015 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं ! ( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?) आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.

चर्चा नको? वाद हवा??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते.

शब्द झाले मोती...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे..

उर्जा घड्याळ

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 26/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.