Skip to main content

विचार

कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन

Published on 26/11/2015 - 17:19 प्रकाशित मुखपृष्ठ
जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ? पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19564

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

Published on 24/11/2015 - 15:58 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
लेखनप्रकार

याद्या 10169

बिहारचा प्रवास उलट ?

Published on 24/11/2015 - 08:30 प्रकाशित मुखपृष्ठ
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.
लेखनविषय:

याद्या 16679

महापौर बंगल्याचे सेनेला चॉकलेट !!

Published on 24/11/2015 - 08:26 प्रकाशित मुखपृष्ठ
सरता सप्ताह दीपोत्सवाचा होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जरी बिहारमध्ये भाजपाचा सपशेल पराभव झालेला असला तरी कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या असल्यामुळे ‘वर्षा’वरचे वातावरण बरे होते. शिवाय तिकडे कोल्हापुरातही ताराराणी आघाडी समवेत भाजपाचा महापौर बसू शकतो अशी एक शक्यता सुरुवातीला वाटू लागली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर भाजपात वातावरण आनंदाचे होते. असा या साऱ्या आनंदमयी वातावरणात त्या आधीच्या पंधरा वीस दिवसांचे सारे राजकीय कवित्व विसरून जाण्याचेचे संकेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी दिलेच होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1060

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

Published on 23/11/2015 - 21:52 प्रकाशित मुखपृष्ठ
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 25530

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .

Published on 23/11/2015 - 13:48 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
लेखनप्रकार

याद्या 6814

अंतर्यामी ओरीगामी

Published on 23/11/2015 - 09:44 प्रकाशित मुखपृष्ठ

अंतर्यामी ओरीगामी

गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .
"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात

याद्या 4512

दिवस असे की - कथा

Published on 23/11/2015 - 01:22 प्रकाशित मुखपृष्ठ
-----दिवस असे की - कथा---------------- दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला . "आपल्या पायातल्या फाटक्या चपलांकडे पाहुन वर्गातली मुले हसतात , आपली टर उडवतात . आपल्यालाही चालताना खुप त्रास होतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1911

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

Published on 22/11/2015 - 18:12 प्रकाशित मुखपृष्ठ
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये. तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3983

धडा

Published on 22/11/2015 - 14:10 प्रकाशित मुखपृष्ठ
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

याद्या 7316